शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

जेडीएसकडून भाजपाला पाठिंबा देण्याचे संकेत; सिद्धारामय्या म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 15:42 IST

विधानसभेच्या १५ जागांसाठी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजल्याने कर्नाटकमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

बंगळुरू - विधानसभेच्या १५ जागांसाठी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजल्याने कर्नाटकमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपासमोर सरकार वाचवण्याचे आव्हान आहे. तर काही दिवसांपूर्वीपर्यंत  आघाडीचे सरकार चालवणाऱ्या काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातील आघाडीमध्ये फूट पडल्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. दरम्यान, या सर्वांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धारामय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुमारस्वामी आम्हाला पाठिंबा देतील किंवा नाही यावरून आम्हाला काहीही फरक पडत नाही, सध्यातरी ज्या आमदारांनी बंडखोरी करून पक्ष सोडला आहे. अशांना पराभूत करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.

भाजपा आणि जेडीएसमधील वाढत्या जवळीकीविषयी प्रतिक्रिया देताना सिद्धारामय्या म्हणाले की,’’कुमारस्वामी आम्हाला पाठिंबा दिला किंवा नाही दिला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. सध्यातरी विधानसभेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या बंडखोर आमदारांपैकी कुणीही जिंकून येणार नाही याचा बंदोबस्त करण्यास आमचे प्राधान्य आहे.’’

जेडीएसचे ज्येष्ठ नेते बसवराज होराती यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते.’’पाच डिसेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर जर येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमतासाठी आमदारांची संख्या कमी पडत असेल तर आमचा पक्ष येडियुरप्पा सरकारला पाठिंबा देऊ शकतो. सध्याच्या स्थितीत राज्यातील भाजपा, काँग्रेस आणि जेडीएस या तिन्ही पक्षांपैकी एकाही पक्षाचे आमदार सरकार पाडून मध्यावधी निवडणूक घेण्यास इच्छुक नाहीत.’’असे होराती म्हणाले होते.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)congressकाँग्रेस