शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

टपाल तिकीटांवरुन इंदिरा गांधी, राजीव गांधी हद्दपार

By admin | Published: September 15, 2015 9:28 AM

भारताच्या टपाल खात्याने २००८ मध्ये प्रकाशित केलेली इंदिरा गांधी व राजीव गांधीचे टपाल तिकीट आता हद्दपार होणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - भारताच्या टपाल खात्याने २००८ मध्ये प्रकाशित केलेली इंदिरा गांधी व राजीव गांधीचे टपाल तिकीट आता हद्दपार होणार आहे. याऐवजी केंद्र सरकार आता दिनदयाळ उपाध्याय, जयप्रकाश नारायण या नेत्यांचे टपाल तिकीट प्रसिद्ध करणार असल्याची माहिती उघड झाली आहे. 
२००८ मध्ये यूपीए सरकारने इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ तिकीटे प्रसिद्ध केली होती. नवीन आठ तिकीटांच्या मालिकेत याचा समावेश करण्याता आला होता व तिकीटांचे मूल्य ५ रुपये एवढे होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने टपाल तिकीटासंदर्भात माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. यात सरकारने ५ रुपयांच्या तिकीटांची मालिका बंद करणार असल्याचे म्हटले आहे. या मालिकेत फक्त राजीव गांधी व इंदिरा गांधीवरील तिकीटांचा समावेश होता. याऊलट आगामी काळात सरकारतर्फे दिनदयाळ, उपाध्याय, जयप्रकाश नारायण, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि राममनोहर लोहिया यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं प्रकाशित केली जातील असेही सरकारने स्पष्ट केले. 
आगामी काळात भाजपा सरकार छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा, पंडित भीमसेन जोशी आदी मान्यवरांवरील तिकीटांची नवी मालिका सुरु करणार असल्याचे समजते.