शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

भारत -चीन सीमा वाद का ताणला जातोय?

By admin | Published: July 12, 2017 4:14 AM

भारत आणि चीनने भूतकाळात अनेकदा सीमेसंबंधी मुद्दे सोडविलेले आहेत.

सिंगापूर : भारत आणि चीनने भूतकाळात अनेकदा सीमेसंबंधी मुद्दे सोडविलेले आहेत. पण यावेळेस हा प्रश्न का सोडवू शकत नाहीत याचे कोणतेही कारण सांगता येणार नाही, असे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी बोलून दाखवले. ‘इंडिया -आसियान अँड द चेंजिंग जियोपॉलिटिक्स’विषयावर व्याख्यान देताना जयशंकर म्हणाले की, ही सीमा अतिशय दूरपर्यंत पसरलेली आहे.. जमिनी स्तरावर सीमेबाबत सहमती झालेली नाही. त्यामुळे असे मतभेद होऊ शकतात. हे मतभेद यंदाच प्रथम झाले नसून, यापूर्वीही ते झाले होते. भूतान, भारत आणि चीन यांच्या सीमेजवळ डोकलाम भागात चिनी सैन्याने रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तीन आठवड्यांपासून या भागात दोन देशात तणाव निर्माण झाला आहे. भूतान या भागाला डोकलाम म्हणून ओळखते. या भागाचे भारतीय नाव डोका ला असून चीन याला डोंगलांग म्हणते. भारत आणि चीन यांच्यात जम्मू - काश्मीर ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ३,४८८ किमी लांब सीमा आहे. यातील २२० किमीचे क्षेत्र सिक्किममध्ये येते. जयशंकर म्हणाले की, भारत -चीन संबंधात सुधारणा झाल्यास याचा असियान आणि आशिया प्रशांत क्षेत्र आणि जागतिक पातळीवरही थेट परिणाम होईल. दोन महाशक्ती असून त्यांच्यात काही मुद्यावरुन वाद असू शकतात. या देशांना दीर्घ इतिहास आहे. अलिकडच्या काळातील इतिहास मात्र खडतर आहे. भारत-चीन संबंध एका उंचीपर्यंत पोहचलेले असल्यामुळे यातून फार काही गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे वाटत नाही. >भारतात होत असलेल्या परिवर्तनाचाही जयशंकर यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, पायाभूत सुविधा वाढविल्या जात आहेत. भारतातील अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. व्यापार करणे अधिक सोपे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या व्याख्यानाचे आयोजन ली कुआन यिऊ स्कूल आॅफ पब्लिक पॉलिसी आणि भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने केले होते.