शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
4
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
5
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
6
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
7
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
8
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
10
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
11
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
12
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
13
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
14
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
15
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
16
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
17
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
18
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
19
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
20
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट

भारत-पाक नेहमीच शत्रू म्हणून राहू शकत नाही - पाक NSA

By admin | Published: April 13, 2017 9:06 AM

कुलभूषण जाधव यांनी फाशीची शिक्षा दिल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला. भारताच्या या इशा-यानंतर पाकिस्तान बिथरलेला दिसतो आहे. कारण

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 13 - कुलभूषण जाधव यांनी फाशीची शिक्षा दिल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला. भारताच्या या इशा-यानंतर पाकिस्तान बिथरलेला दिसतो आहे. कारण, भारत आणि पाकिस्तान नेहमी एकमेकांचे शत्रू बनून राहू शकत नाहीत आणि दोन्ही शेजारी देशांनी संवाद साधण्यासहीत वादांवर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे, असे मत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर जंजुआ यांनी मांडले आहे.
 
पाकिस्ताननं भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानचे संबंध आणखी ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवरच जंजुआ यांनी हे वक्तव्य केले आहे. तर दुसरीकडे, भारत द्विपक्षीय संबंधांचे उल्लंघन करुन काश्मीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी नकार देत असल्याचा आरोपही जंजुआ यांनी केला आहे. दरम्यान, जाधव यांनी फाशी शिक्षा झाल्यास याचे द्विपक्षीय संबंधांवर वाईट परिणाम होतील, असे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. 
 
कॅनडातील उच्चायुक्त पेरी सेल्डवुड यांच्यासोबत मंगळवारी झालेल्या संवादादरम्यान जंजुआ यांना सांगितले की, "भारत काश्मीरला एक द्विपक्षीय समस्या समजत आहे आणि दुसरीकडे याच नियमांचे उल्लंघन करुन काश्मीर मुद्यावर चर्चाही करत नाही", असा कांगावा त्यांनी केला. 
 
काश्मीरमधील परिस्थितीचा यावेळी उल्लेख करत ते असेही म्हणाले की, "कट्टरपंथीयांचे विचार केवळ शक्तीचा वापर करुन बदलले जाऊ शकत नाहीत, तर त्यासाठी त्यांचे हृदय जिंकावे लागेल. यासाठी दोन्ही देशांना संवाद साधायला हवा".
मात्र, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाविरोधात कठोर पाऊलं उचलत नाही तोपर्यंत कोणत्याही विषयावर चर्चा होणार नाही, असे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. 
 
पाकिस्तानातील सरकारी असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान (एपीपी)नं जंजुआ यांच्या वक्तव्याचा हवाला देत सांगितले की, दोन्ही देशांना संवाद आणि वादावर उपाय शोधून काढणे गरजेचं आहे.  भारत-पाकिस्तान नेहमीच एकमेकांचे शत्रूराष्ट्र बनून राहू शकत नाहीत. शिवाय यावेळी एनएसजी गटात पाकिस्तानच्या सदस्यत्वाचा विचारासाठी भेदभाव न करण्याचा आग्रहही त्यांनी केला.