शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

देशातील लोकशाहीवर सध्या हुकूमशाहीचा प्रभाव वाढतोय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 04:47 IST

स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांतच भारतातील लोकशाही अशा प्रकारे धोक्यात येईल याची देशाचा पाया रचणाऱ्या धुरिणांनी कधी कल्पनाही केली नसेल.

नवी दिल्ली : काही देशद्रोही आणि गरीबविरोधी शक्ती सध्या देशात वैमनस्य व हिंसाचाराचे विष पसरवीत आहेत व देशाच्या लोकशाहीवर हुकूमशाहीचा प्रभाव वाढत चालला आहे, असा आरोप करीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी मोदी सरकारवर आडून टीका केली.सोनिया गांधी असेही म्हणाल्या की, देशात सध्या कुटिल विचारांचा बोलबाला आहे, अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले आहे व लोकशाही संस्था नष्ट केल्या जात आहेत. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांतच भारतातील लोकशाही अशा प्रकारे धोक्यात येईल याची देशाचा पाया रचणाऱ्या धुरिणांनी कधी कल्पनाही केली नसेल.छत्तीसगढच्या ‘नया रायपूर’ या नव्याने उभारण्यात येत असलेल्या राजधानीत विधानसभा संकुलाच्या पायाभरणी समारंभानिमित्त आधी ध्वनिमुद्रित करून पाठविलेल्या हिंदी संदेशात सोनियाजी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, गेला काही काळ देशाचा गाडा रुळावरून घसरविण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. त्याने देशापुढे नवी आव्हाने उभी राहिली आहेत.

आज देश एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. गरीबविरोधी, देशद्रोही शक्ती, तसेच सत्तेत असलेले वैमनस्य आणि हिंसाचाराचे विष कालवून लोकांमध्ये आपसात भांडणे लावत आहेत.प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल, विधानसभा अध्यक्ष चरन दास महंत व राज्याचे मंत्री उपस्थित होते. राहुल गांधी यांनीही दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअल हजेरी लावली.लोकांचा आवाज दडपू पाहत आहेतकोणाचेही थेट नाव न घेता काँग्रेस अध्यक्षा म्हणाल्या की, ते देशातील लोकांचा आवाज दडपू पाहत आहेत. तरुण पिढी, आदिवासी, महिला, शेतकरी, छोटे दुकानदार व जवान अशा सर्वांची तोंडे ते बंद करू पाहत आहेत. केवळ विधानसभेची भव्य वास्तू बांधून लोकशाहीचे रक्षण होणार नाही. त्यासाठी आपणा सर्वांना लोकशाही व संविधानाच्या रक्षणाची शपथ घेऊन अविरतपणे झटावे लागेल, असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसdemocracyलोकशाही