शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

नशिराबादला २० पासून उपोषण स्मार्ट व्हिलेज समितीचा पुढाकार

By admin | Published: June 08, 2016 11:03 PM

नशिराबाद : गावातील मूलभूत समस्या कायमच असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. त्या समस्यांबाबत निवेदने देऊनही मार्गी लागत नसल्याने अखेर स्मार्ट व्हिलेज समितीने २० जूनपासून ग्रामपंचायत समोर तंबू ठोकून उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

नशिराबाद : गावातील मूलभूत समस्या कायमच असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. त्या समस्यांबाबत निवेदने देऊनही मार्गी लागत नसल्याने अखेर स्मार्ट व्हिलेज समितीने २० जूनपासून ग्रामपंचायत समोर तंबू ठोकून उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
सुंदर व स्वच्छ गाव साकारून स्मार्ट सिटी बनविण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन माजी खासदार वाय.जी.महाजन यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट व्हिलेज समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावातील दूषित पाणी, वाढते अतिक्रमण, पथदीप, बंद सायरन, शौचालय दैना, रस्त्यांची दुर्दशा, बिन तोट्यांचे नळ, तुंबलेल्या गटारी, घंटा नसलेल्या कचरा गाड्या, नदी पात्रातील केरकचरा आदी समस्यांबाबत उहापोह करीत स्मार्ट व्हिलेज समितीने ग्रामपंचायतील निवेदन दिले होते. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कच व डांबर टाकून डागडुजी होणे अपेक्षित आहे. रस्त्यांच्या दैनामुळे अपघात होऊन जखमी झाल्याच्या घटना आहे. रस्ते मृत्यूला आमंत्रण देत आहे; मात्र याबाबत ग्रामपंचायत दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
अखेर स्मार्ट सिटीने दिलेल्या निवेदनाबाबत १९ जूनपर्यंत मार्ग न निघाल्यास २० जूनपासून उपोषण करण्याचा निर्णय स्मार्ट सिटीच्या बैठकीत झाला. उपोषण करूनही दखल न घेतल्यास पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजीसाठी भीक मांगो आंदोलनाची तयारी समितीने दर्शविली आहे.
बैठकीला समितीचे अध्यक्ष विनायक धर्माधिकारी, उपाध्यक्ष सैय्यद बरकत अली, विनोद रंधे, दगडू माळी, बंडू खंडारे, धनंजय वाणी, बंडू रत्नपारखी, अनिल वाणी, नजीरअली आदी उपस्थित होते. (वार्ताहर)