शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:11 IST

चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेले सुरेंद्र सिंग यांचे वडील बलवंत सिंग राजस्थानातील अलवर येथे राहतात. सुरेंद्र सिंग यांनी आपल्या वडिलांना फोनवरूनच त्या दिवशीचा संपूर्ण थरार सांगितला.

ठळक मुद्देसुरेंद्र सिंग यांनी आपल्या वडिलांना फोनवरूनच त्या दिवशीचा संपूर्ण थरार सांगितला.जवानाच्या पत्नीने सांगितला, पतीचा पराक्रम.सुरेंद्र यांच्या डोक्याला 10-12 टाके पडले आहेत आणि हाता-पायालाही इजा झाली आहे.'

नवी दिल्ली : लडाखमधील गलवान खोऱ्यातील चीनीसैनिकांच्या धोक्याची कहाणी हळू-हळू समोर येऊ लागली आहे. सोमवारी रात्री चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेल्या एका जवानाने, आपल्या वडिलांना त्या रात्रीची थरारक कहाणी सांगितली. या चकमकीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले, तर चीनचे 35 सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे.

भारताचे 300 जवान vs चीनचे 2500 जवान -चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेले सुरेंद्र सिंग यांचे वडील बलवंत सिंग राजस्थानातील अलवर येथे राहतात. सुरेंद्र सिंग यांनी आपल्या वडिलांना फोनवरूनच त्या दिवशीचा संपूर्ण थरार सांगितला. एका खासगी वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जवान सुरेंद्र सिंग यांचे वडील बलवंत सिंग यांनी सांगितले, की 'त्या दिवशी मला 11-12 वाजता फोन आला. मी विचारले, कोठे आहे, तर त्याने सांगितले, रुग्णालयात आहे. लेहमधील रुग्णालयात, मी व्यवस्थित आहे.' जवान सुरेंद्र सिंग फोनवर म्हणाले, 'आम्ही 300-400च जवान होतो. चीनी सैनिक अचानक आले. ते 2,000-2,500 होते. त्यांच्याकडे रॉड आणि दंड होते. त्यांनी अचाकच दगड फेक करायला सुरुवात केली. आमच्याकडे शस्त्र नव्हते. माझ्या डोक्याला 10-12 टाके पडले आहेत आणि हाता-पायालाही इजा झाली आहे.'

India China Face Off: गलवान हिंसक झटापट; 3 दिवसांनंतर चीनने 2 मेजरसह 10 भारतीय जवानांना सोडले

जवानाच्या पत्नीने सांगितला, पतीचा पराक्रम -जखमी जवान सुरेंद्र यांची पत्नी गुरप्रीत कौर यांनी आपल्या पतीचा पराक्रम सांगितला. त्या म्हणाल्या, सुरेंद्र यांनी शत्रूच्या दोन-तीन सैनिकांना मारले. यावेळी जवानांकडे शस्त्र नव्हते. चर्चेचे वातवरण होते. चर्चेतून समस्या सोडविण्यावर बोलणे सुरू होते. असे असतानाच चिनी सैनिक शस्त्रांसह आले.

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'

तणाव कायम -गेल्या 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. गेल्या महिनाभरापासून लडाखच्या अनेक भागांत चीन आणि भारताचे सैन्य समोरासमोर आहे. चर्चेनंतरही चीन दिलेला शब्द पाळायला तयार नाही. त्यांनी भारतीय सैनिकांनाही धोका दिला आहे. चर्चा सुरू असतानाही चीन सीमेवर सैनिक आणि शस्त्रांचा साठा वाढवतच होता. 

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

टॅग्स :border disputeसीमा वादSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवानIndiaभारतladakhलडाखchinaचीन