शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

विमा कंपन्या प्रीमियमचे दर वाढविणार

By admin | Published: March 14, 2017 12:25 AM

सर्वसाधारण विमा कंपन्या आपल्या प्रीमियमचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढविण्याचा विचार करत आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील दावे सोडविताना विमा कंपन्या तोट्यात येत आहेत

१० ते १५ टक्के वाढ : ‘इरडा’चा निर्णय एक एप्रिलपासून लागूमुंबई : सर्वसाधारण विमा कंपन्या आपल्या प्रीमियमचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढविण्याचा विचार करत आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील दावे सोडविताना विमा कंपन्या तोट्यात येत आहेत. त्यातच व्याजाचे दर कमी झाल्याने अनेक कंपन्यांची गुंतवणूकही कमी होत आहे. यावर उपाय म्हणून विमा कंपन्या प्रीमियमचे दर वाढवत आहेत.भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इरडा) यांनीदेखील वाहन विमा आणि कुटुंबाचा आरोग्य विमा योजनेचा प्रीमियम एक एप्रिलपासून वाढविण्याचे संकेत दिलेले आहेत. इरडाचे सदस्य (सामान्य विमा) जी. जे. जोसफ यांनी एका वृत्तसंस्थेस सांगितले की, विमा कंपन्यांच्या १० अशा योजना आहेत की ज्यांचा प्रीमियम वाढविणे गरजेचे आहे. यात प्रापर्टी क्षेत्रातील सीमेंट, वीज आणि फार्मा, याबरोबर कुटुंब आरोग्य योजनांचाही समावेश आहे. या योजनांचा प्रीमियम एक एप्रिलपासून १० ते १५ टक्क्यांनी वाढविला जाऊ शकतो. नॅशनल इन्श्युरन्स कंपनीचे अध्यक्ष सनतकुमार म्हणाले की, मार्केटमध्ये प्रतिस्पर्धी इतके मोठे आहेत की आम्हाला प्रीमियम वाढविण्यात तसूभरही वाव नाही, तरीदेखील आम्ही काही तोट्यातील योजनांचा प्रीमियम १० टक्क्यांनी किंवा त्यापेक्षाही ज्यादा दर वाढविण्यासाठी जीआयसी-री:पुनर्विमा कंपनीसोबत बोलणी करीत आहेत. न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे अध्यक्ष जी. श्रीनिवासन यांनी सांगितले की, त्यांची कंपनी पुढील आर्थिक वर्षापासून अग्नि आणि गु्रप हेल्थ योजनांचा प्रीमियम वाढवू शकते. त्यांनी अपेक्षापेक्षाही कमी दरांमध्ये प्रीमियमचे दर असल्याची पुष्टी दिली. खासगी क्षेत्रातील एस.बी.आय.चे मुख्य कार्यकारी पूषान महापात्रा यांनी सांगितले की, गुंतवणूक कमी झाल्याने होणारा फायदा हा कसा टिकवून ठेवायचा हे मोठे आव्हान आहे. यासाठी कंपनी विविध धोरणे आखत आहे. या कामांमध्ये कुशलता आणणे, खर्चामध्ये नियंत्रण आणणे आणि विम्याची जोखीमची निवड आणि मूल्य निर्धारणामध्ये सुधारणा करणे सामील आहे.