शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

मोदींचे दादरीवर हेतुपुरस्सर मौन

By admin | Published: November 04, 2015 4:27 AM

कोणताही विशेष प्रसंग किंवा औचित्य नसताना सातत्याने टिष्ट्वट सुरू ठेवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरी येथे मोहंमद इकलाखचा जमावाने ठेचून खून केल्याप्रकरणी

नवी दिल्ली : कोणताही विशेष प्रसंग किंवा औचित्य नसताना सातत्याने टिष्ट्वट सुरू ठेवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरी येथे मोहंमद इकलाखचा जमावाने ठेचून खून केल्याप्रकरणी भाष्य केले नाही. त्यांनी हेतुपुरस्सर मौन पाळल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि एकेकाळी मोदींचे खास समर्थक राहिलेल्या अरुण शौरी यांनी केला आहे.मोदी हे होमिओपॅथी विभागाचे गट अधिकारी किंवा विभागप्रमुख नसून देशाचे नेते आहेत. त्यांनी देशाला नैतिक मार्ग दाखवून द्यावा, असे ते एका टीव्ही मुलाखतीत म्हणाले. हिंसाचार आणि बीफ वादानंतर शौरींनी अलीकडे मोदींवर केलेला हा दुसरा थेट हल्ला आहे. शौरी यांनी भाजप सदस्यत्वाचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.रालोआ सरकार हे संपुआ सरकारची कॉपी असून सोबत गाय असलेली काँग्रेस आहे. बिहारमधील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी आणि पक्षनेत्यांनी हा मुद्दा धगधगत ठेवला असताना दादरीसारख्या घटनांबद्दल मोदींनी मुद्दाम मौन पाळले आहे. यापूर्वी शौरींनी केलेल्या टीकेला महत्त्व देण्याचे टाळत भाजपने शौरी हे मंत्री बनू न शकल्याने दु:ख व्यक्त करीत आहेत, असा टोला मारला होता. मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बिहारमध्ये एका समुदायाला दुसऱ्याविरुद्ध भडकावण्याचे काम चालविले आहे. पाकिस्तान खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असताना भारत हळूहळू त्या खड्ड्याकडे वाटचाल करीत आहे. मोदींना २००२ च्या गुजरात दंगलींपासून वैचारिक असहिष्णुतेची सर्वात मोठी झळ पोहोचली आहे. तेच मोठे पीडित ठरले आहेत, या शब्दात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेला युक्तिवाद म्हणजे सर्वात वाईट बचाव होय. मोदींच्या सूडबुद्धीचेच ते योग्य समर्थन ठरेल. विचारवंत हे विवेक बाळगणारे असतात. त्यांच्या उद्देशाबद्दल प्रश्न उपस्थित केला जाऊ नये, असे ते म्हणाले. मोदी तर सर्वसमावेशकपंतप्रधान मोदी हे असहिष्णू नव्हे, तर सर्वसमावेशक असे नेते आहेत, असे स्पष्ट करीत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी भक्कम बचाव केला आहे. मोदी ७ नोव्हेंबर रोजी काश्मीर भेटीवर येत असून त्यावेळी ते पाकिस्तानसोबत चर्चा सुरू करण्याला अनुकूलता दर्शवतील. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००३ मध्ये काश्मीरच्या भूमीवरूनच पाकिस्तानसोबतच्या चर्चेची कोंडी फोडली होती, याचे स्मरणही त्यांनी करवून दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)