शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"सत्तेच्या हव्यासापोटी देशात लागू केली आणीबाणी, एका रात्रीत संपूर्ण देशाचा केला तुरुंग"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 15:02 IST

"एका कुटुंबाचं हित, पक्ष आणि देशहिताच्या वर ठेवण्यात आलं. काँग्रेसमध्ये आजही तिच परिस्थिती आहे"

नवी दिल्ली - देशात 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. आज त्या आणीबाणीला 45 वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आणीबाणीवर भाष्य करताना काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. "45 वर्षांपूर्वी सत्तेच्या हव्यासापोटी एका परिवाराने देशात आणीबाणी लागू केली. एका रात्रीत संपूर्ण देशाचा तुरुंग केला. प्रसारमाध्यमं, न्यायव्यवस्था यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला होता. त्यावेळी गरीबांवर अत्याचारही करण्यात आले होते" असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. 

आणीबाणीवरून अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "लाखो लोकांच्या प्रयत्नांनंतर देशातून आणीबाणी हटवण्यात आली होती. देशात पुन्हा स्वातंत्र्य बहाल करण्यात आलं होतं. मात्र काँग्रेसचं वागणं बदललं नाही. एका कुटुंबाचं हित, पक्ष आणि देशहिताच्या वर ठेवण्यात आलं. काँग्रेसमध्ये आजही तीच परिस्थिती आहे" असं म्हणत शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. 

अमित शाह यांनी काँग्रेसच्या नेत्यांची सध्या पक्षात घुसमट होत असल्याचं देखील म्हटलं आहे. "काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काही मुद्दे मांडले होते. मात्र ते दाबण्यात आले. काहीही विचार न करता पक्षाने एका प्रवक्त्याची हकालपट्टी केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांची सध्या पक्षात घुसमट होत आहे" असं देखील त्यांनी म्हटलं आहे.तसेच काँग्रेसने स्वत:ला आणीबाणीची मानसिकता आताही का कायम आहे?, एकाच घराण्याच्या लोकांना वगळता अन्य नेत्यांना बोलण्याची परवानगी का नाही? आणि काँग्रेसमध्ये नेते निराश का आहेत? असे प्रश्न विचारण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटीवर?, WHO ने दिला गंभीर इशारा

CoronaVirus News : 'मातोश्री' परिसरात कोरोनाचा शिरकाव; मुख्यमंत्र्यांच्या बाजूच्या बंगल्यात सापडला रुग्ण

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; गाठला नवा उच्चांक

बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान

CoronaVirus News : श्वासोच्छवासाच्या योग्य पद्धतीने कोरोनावर करता येते मात; नोबेल विजेत्या तज्ज्ञाचा दावा

टॅग्स :Amit Shahअमित शहाcongressकाँग्रेसBJPभाजपाIndira Gandhiइंदिरा गांधीIndiaभारत