शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

 ‘आंतरराष्ट्रीय कट’: पोलिस करणार अंजूची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 1:41 PM

अंजूचे पाकिस्तानात ज्या प्रकारे स्वागत होत आहे आणि ती ज्या लोकांना भेटत आहे, त्यावरून तिच्या भेटीच्या स्वरुपाबद्दल शंका निर्माण झाल्याची गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली.

भारतातून पाकमध्ये गेलेल्या अंजूची सर्वत्र चर्चा आहे. सोमवारी तिच्या पाकिस्तान प्रवासाच्या परिस्थितीची चौकशी करण्याचे आदेश मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पोलिसांच्या विशेष शाखेला दिले. सीमापार प्रवास आणि नसरुल्लाहशी विवाह हा “आंतरराष्ट्रीय कट” होता का, हे तपासण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले. अंजूचे पाकिस्तानात ज्या प्रकारे स्वागत होत आहे आणि ती ज्या लोकांना भेटत आहे, त्यावरून तिच्या भेटीच्या स्वरुपाबद्दल शंका निर्माण झाल्याची गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली.

अंजूचे वडील गया प्रसाद थॉमस हे मूळचे ग्वाल्हेरच्या बोना गावचे आहेत. लग्नानंतर ती पती अरविंदसोबत राजस्थानच्या भिवडी येथे राहत होती. 

इस्लाम स्वीकारून फातिमा बनलेल्या अंजूवर नसरुल्लाहसोबत निकाह केल्यापासून पाकमधून महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे. नुकतेच तेथील एका बड्या उद्योगपतीने अंजूची भेट घेत गृहनिर्माण भूखंड, ५० हजारांचा धनादेश आणि त्याच्या कंपनीत नोकरीचे आश्वासन दिले होते. अंजूने इस्लाम स्वीकारल्यामुळे अभिनंदन करण्याचा छोटा प्रयत्न असल्याचे म्हणत या उद्योगपतीने पाकमधील अन्य श्रीमंतांनीही अंजूला मदत करावी, असे आवाहन केले होते. 

दरम्यान, अंजूने अरविंदला फोन करून धमकी दिल्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. यात, ती पतीला तू माझ्यासोबत काय केलंस हेदेखील सर्वांना सांग, असे म्हणत शिविगाळ करते. दोघांमध्ये जोरदार भांडण होते. मुलं माझी आहेत आणि माझ्यासोबत राहतील, असे अरिवंद म्हणतो, त्यावर मी कोणत्याही थराला जाऊ शकते, असे अंजू म्हणते.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट