शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जम्मूसह पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा सुरू; खोऱ्याचा अपवाद; तूर्त सातच दिवसांसाठीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 06:58 IST

केंद्रीय मंत्र्यांची ही तुकडी तुलनेने कमी प्रकाश झोतातील; परंतु परिणामकारक असा शिक्षणात्मक कार्यक्रम हाती घेण्याची ही पहिलीच वेळ असेल.

जम्मू : सर्वोच्च न्यायालयाने काश्मीर प्रशासनाची कानउघाडणी केल्यानंतर जम्मू-काश्मीरध्ये सुमारे साडेपाच महिन्यांनंतर बुधवारी मोबाईल इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. मात्र, ती केवळ जम्मू विभागांमधील पाच जिल्ह्यांसाठीच असून, काश्मीर खोºयातील एकाही जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा सुरू झालेली नाही.

आता केवळ सात दिवसांसाठीच पोस्टपेड मोबाईल इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली असून, नंतर आढावा घेऊ न ती कायम ठेवायची किंवा अन्य जिल्ह्यांमध्येही लागू करायची याबाबत निर्णय होणार आहे. जम्मू, रियासी, उधमपूर, सांबा, कठुआ या पाच जिल्ह्यांत पोस्टपेड मोबाईलवरच आज ही इंटरनेट सेवा सुरू झाली.

जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांतही ती सुरू झाली तरी दुपारपर्यंत इंटरनेट मिळतच नसल्याची तक्रार अनेक मोबाईलधारक करताना दिसत होते. तिथे टू-जी सेवाच असल्याने ती अतिशय संथ आहे आणि अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नाही, अशा तक्रारी काहींनी केल्या.गृह विभागाने इंटरनेट सेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती मंगळवारी दिली. काश्मीर विभागामध्ये ४00 इंटरनेट किआॅस्क सुरू करण्यात येणार असल्याचेही गृह विभागाने म्हटले आहे. रुग्णालये, बँका, सरकारी कार्यालये येथे तसेच इंटरनेट सेवा देणाºया संस्थांना ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध होणार आहे. पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हॉटेल, यात्रा कंपन्या तसेच टूर्स व ट्रॅव्हल्स कंपन्यांनाही इंटरनेट उपलब्ध होणार आहे.जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा असलेला अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर सहा महिन्यांनी नरेंद्र मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये आक्रमक राजकीय जनसंपर्क साधण्याचा निर्णय घेतला आहे. या आक्रमक मोहिमेला अंतिम स्वरूप दिले जात असून, लोकांशी संवाद साधण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची एक मोठी तुकडीच जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रवास करील. लोकांशी संपर्क साधण्यासाठीच्या या फार मोठ्या मोहिमेत मोदी सरकारमधील दुसºया फळीतील मंत्री सहभागी असतील व ते केंद्र सरकार राबवत असलेली कल्याणकारी धोरणे व कार्यक्रमांचा प्रसार करतील. या मोहिमेचा हेतू हा लोकांंनी सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी व त्यांना त्यात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आहे.

केंद्रीय मंत्र्यांची ही तुकडी तुलनेने कमी प्रकाश झोतातील; परंतु परिणामकारक असा शिक्षणात्मक कार्यक्रम हाती घेण्याची ही पहिलीच वेळ असेल. पंतप्रधानांनी अंतिम स्वरूप दिलेली हा महत्त्वाची जनसंपर्क मोहीम असल्याचे मंत्र्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.आठवडाभर चालणाºया या संपर्क मोहिमेत गृहराज्यमंत्री जी. कृष्ण रेड्डी, स्मृती इराणी, रवी शंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, जितेंद्र सिंह आणि पीयूष गोयल व इतर सहभागी होतील.

 

टॅग्स :InternetइंटरनेटJammu Kashmirजम्मू-काश्मीर