शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

घुसखोर दहशतवाद्यांना सर्जिकल स्ट्राईकद्वारे चोख प्रत्युत्तर - राष्ट्रपती

By admin | Published: January 31, 2017 11:33 AM

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ससदेच्या संयुक्त सभागृहापुढे अभिभाषण केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ -  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे अभिभाषण केले. ' हे अधिवेशन ऐतिहासिक' असल्याचे सांगत राष्ट्रपतींनी सरकारने राबवलेल्या विविध योजना, धोरणांचा आढावा घेतला. गरीब, दलित, शोषित, शेतकरी आणि श्रमिक वर्ग सरकारच्या  धोरणात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले. या भाषणात त्यांनी नोटांबदी व पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख केला. सतत होणा-या घुसखोरीला आळा घालण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक हे चोख प्रत्युत्तर ठरेल असे त्यांनी नमूद केले. तर काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा आणि दहशतवादासाठी होणारा पैशांचा पुरवठा रोखण्यासाठी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ' नोटाबंदी'चा निर्णय घेतल्याचेही राष्ट्रपतींनी सांगितले.  दरम्यान आज आर्थिक सर्वेक्षणही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील महत्वपूर्ण मुद्दे : 
 
- हे ऐतिहासिक अधिवेशन आहे.
 
- 'सबका साथ, सबका विकास', हेच आमच्या सरकारचं ध्येय.
 
- आत्तापर्यंत १.२ कोटींहून अधिक ग्राहकांनी एलपीजीची सबसिडी सोडली.
 
- गरीबांचे जीवनमान सुधारावे यासाठी आमच्या सरकारने अनेक प्रयत्न केले असून अनेक नव्या योजना आणल्या आहेत.
 
- जनशक्तीमुळे स्वच्छ भारत अभियानाचे जन-आंदोलनात रुपांतर झाले.
 
- २६ कोटी जनधन खाती उघडली गेली.
 
-  काळ्या पैशाविरोधात लढण्यासाठी नागरिकांनी सरकारला साथ दिली.
 
- विविध सामाजिक सुरक्षा योजनांअंतर्गत १३ कोटी गरीबांना सामावण्यात आले.
 
-प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत देशात घर नसलेल्या प्रत्येक गरीबाला हक्काचे घर देण्याचा सरकारचा निर्धार.
 
- पी व्ही सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर यांनी भारतीय महिलांच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले.
 
- दिनदयाल अंत्योदय योजने अंतर्गत तब्बल १६ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले.
 
- देशात सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्यास केंद्र सरकार कटीबद्ध आहे.
 
-  आगरतळा-त्रिपुरा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज मार्गांना जोडणार.
 
-  सहा लाख दिव्यांगांना रोजगार देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
 
- वन रँक वन पेन्शनचा प्रश्न केंद्र सरकारने निकाली काढला.
 
- आमच्या लष्कराचा आम्हाला अभिमान वाटतो.
 
-  स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून सरकार अडीच लाख एससी, एसटी आणि महिला उद्योजकांना मदत करणार.
 
- काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा आणि दहशतवादासाठी होणारा पैशांचा पुरवठा रोखण्यासाठी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ' नोटाबंदी'चा निर्णय घेतला.
 
- भारतनेट उपक्रमाअंतर्गत देशातील ७५ हजार ७०० ग्रामपंचायतीना ऑप्टीकल फायबर केबलशी जोडणार.
 
- सातवा वेतन आयोग लागू झाल्याने ५० लाख कर्मचारी आणि ३५ लाख निवृत्त कर्मचा-यांना झाला फायदा .