शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

घुसमट होतेय! गुन्ह्याचा भागीदार व्हायचे नाहीय; संबित पात्रांना भिडणाऱ्या प्रवक्त्याने काँग्रेसचेच वाभाडे का काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 11:41 IST

gaurav vallabh Upset Resigne Congress: मी सकाळ संध्याकाळी सनातन विरोधी नारेबाजी करू शकत नाही तसेच देशाच्या विकासात योगदान देणाऱ्यांना शिवीगाळ करू शकत नाही. - गौरव वल्लभ

जमशेदपूर : भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रांसोबत टीव्ही डिबेटमध्ये जुगलबंदी करणाऱ्या काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आजवर काँग्रेसची बाजू घेऊन बोलणाऱ्या वल्लभ यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेल्या राजीनाम्यात काँग्रेसचेच वाभाडे काढले आहेत. असे का घडले, वल्लभ हे काँग्रेसमध्ये काय अपेक्षा ठेवून आले होते? त्यांचा मोहभंग का झाला...

खर्गेंना लिहिलेल्या पत्रात, काँग्रेस पक्ष आज ज्या प्रकारे दिशाहीन होऊन पुढे जात आहे. यामुळे मला पक्षामध्ये चांगले वातावरण वाटत नाहीय. मी सकाळ संध्याकाळी सनातन विरोधी नारेबाजी करू शकत नाही तसेच देशाच्या विकासात योगदान देणाऱ्यांना शिवीगाळ करू शकत नाही. यामुळे मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे वल्लभ यांनी म्हटले आहे. 

गौरव वल्लभ यांनी 2019 मध्ये झारखंडमधील जमशेदपूर पूर्व येथून पहिल्यांदा निवडणूक लढवली. वल्लभ यांना 18 हजारांहून अधिक मते मिळाली आणि ते तत्कालीन सीएम रघुबर दास आणि सरयू रॉय यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर होते. यानंतर 2023 मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उदयपूरमधून निवडणूक लढवली होती. वल्लभ यांचा भाजपच्या ताराचंद जैन यांच्याकडून 32 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला होता. गौरव वल्लभ हे अर्थशास्त्रातील उत्तम तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापकही राहिले आहेत. त्यांनी एका डिबेटमध्ये भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना विचारले होते की एक ट्रिलियनमध्ये किती शून्य आहेत, याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. जेव्हा पात्रा यांनी हा प्रश्न वारंवार टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा वल्लभ यांनी 5 ट्रिलियनमध्ये 12 शून्य असतात, असे सांगितले होते. 

सत्य लपविणे हा गुन्हा आहे. मला अशा गुन्ह्याचा भागीदार व्हायचे नाहीय, अशा शब्दांत वल्लभ यांनी काँग्रेसमध्ये चाललेल्या गोष्टींवर भाष्य केले आहे. अयोध्येतील राम मंदिराबाबत काँग्रेसने घेतलेल्या पक्षाच्या भुमिकेने मला स्तब्ध केले होते. मी जन्माने हिंदू आहे आणि व्यवसायाने शिक्षक. पक्षाच्या या भुमिकेने मला अस्वस्थ केले. पक्षाचे आघाडीचे नेते नेहमीच सनातन विरोधी बरळत असतात. त्यावर पक्षाने मौन बाळगणे म्हणजे त्यांच्या जाचक गोष्टींना अनुमोदन दिल्यासारखे आहे. एकीकडे जातीय जनगणनेवर बोलतो तर दुसरीकडे दुसरीकडे संपूर्ण हिंदू समाजाला विरोध करताना दिसतो. यामुळे पक्ष विशिष्ट धर्माचा समर्थक असल्याचा चुकीचा संदेश जनतेमध्ये जात आहे. हे काँग्रेसच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे, असे वल्लभ यांनी म्हटले आहे. 

सध्या आर्थिक बाबींवर काँग्रेसची भूमिका नेहमीच देशातील संपत्ती निर्माण करणाऱ्यांना अपमानित करण्याची आणि त्यांचा गैरवापर करण्याची, त्यांना शिव्या देण्याची राहिली आहे. आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या विरोधात आपण झालो आहोत. यावर तर जगाने देशाला महत्व दिले आहे. आम्ही सत्तेत नसलो तरी देशहितासाठी पक्षाची आर्थिक धोरणे आमच्या जाहीरनाम्यातून आणि इतर ठिकाणी चांगल्या पद्धतीने मांडता आली असती, असे मला वाटत होते. म्हणून मी पक्षात आलो. माझ्यासारख्या जाणकाराला हे करता येऊ शकत नाही हे गुदमरल्यापेक्षा कमी नाही, अशी टीका वल्लभ यांनी केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSambit Patraसंबित पात्रा