शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी; केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमली उच्चस्तरीय चौकशी समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 5:19 AM

विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नायब राज्यपालांकडून मदत जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जोरदार पावसामुळे दिल्लीतील जुने राजेंद्रनगर येथे शनिवारी राऊ आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरून तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोकसभेत सर्व पक्षांनी केली. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती सोमवारी स्थापन केली. त्यामध्ये दिल्ली सरकारमधील प्रधान सचिव (गृहखाते), दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त, अग्निशमन सल्लागार यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत नायब राज्यपालांनी जाहीर केली आहे आहे. सोमवारी दुर्घटनेच्या चौकशीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, राऊ आयएएस कोचिंगची इमारत अनधिकृत होती. काही कोचिंग सेंटर माफिया बनले आहेत.

आम्ही भरपाई घेऊन काय करणार?

आम्ही भरपाई घेऊन काय करणार? त्यापेक्षा दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करा, अशी मागणी नवीन दलवीन या मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केली. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला. त्याचे काका राज यांनी सांगितले की, नवीनचा मृतदेह त्रिवेंद्रम येथे नेण्यात आला असून त्याच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

कारवाई करण्याचे नायब राज्यपालांचे आश्वासन

आयएएस कोचिंग सेंटरच्या दुर्घटनेत तीन विद्यार्थी मरण पावले होते. त्या घटनास्थळी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सोमवारी भेट देऊन तिथे निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे सक्सेना यांनी निदर्शकांना सांगितले. या दुर्घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील आप कार्यालयासमोर निदर्शने केली. दिल्ली पालिका अधिकाऱ्यांची राऊ कोचिंग सेंटरसंदर्भातील पोलिस चौकशी करण्याची शक्यता आहे. 

‘हे गॅस चेंबरइतकेच भयानक’

कोचिंग सेंटरचे पेव फुटले असून, त्यांच्या इमारती गॅस चेंबर इतक्याच भयानक असतात. स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीच्या नावाखाली उघडण्यात आलेली सेंटर जाहिरातींसाठी करत असलेल्या प्रचंड खर्चाची चौकशी झाली पाहिजे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सभागृहात सांगितले. दुर्घटनेबाबत राज्यसभेत काही काळ चर्चा झाली. कोचिंग सेंटर हा व्यवसाय झाला आहे. त्यात या सेंटरना मिळणाऱ्या अमाप पैशामुळे शिक्षणाचेही व्यावसायिकरण झाले, असे धनखड म्हटले. 

टॅग्स :delhiदिल्ली