शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

देशभरात गुंतवणूक घोटाळा !

By admin | Published: March 27, 2016 3:33 AM

महाराष्ट्रासह देशभरातील पॉन्झी कंपन्यांविरुद्ध आता जवळजवळ तपासयुद्ध पुकारले गेल्याचे संकेत मिळाले आहेत. आरबीआयने १०४ कंपन्यांबाबतच्या तक्रारींचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये विशेष तपास चालविला आहे.

- हरीश गुप्ता,  नवी दिल्लीमहाराष्ट्रासह देशभरातील पॉन्झी कंपन्यांविरुद्ध आता जवळजवळ तपासयुद्ध पुकारले गेल्याचे संकेत मिळाले आहेत. आरबीआयने १०४ कंपन्यांबाबतच्या तक्रारींचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये विशेष तपास चालविला आहे. या कंपन्यांकडे सार्वजनिक गुंतवणूक केली गेल्याचा संशय असल्याचे आरबीआयने सरकारला सांगितले आहे. सीबीआय, सक्तवसुली संचालनालय (ईडी) तसेच कंपनी व्यवहार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सेबी आणि विशेष तपास संघटनांनी (एसएफआयओ) पॉन्झी/ चिटफंड कंपन्यांबाबत स्वतंत्र तपास चालविला आहे. शेकडो गरीब गुंतवणूकदारांचा पैसा या कंपन्यांमध्ये गुंतविला गेला आहे. विविध तपास संस्थांकडून गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले असता गुंतवणुकीची आकडेवारी ३३,१४१ कोटी रुपयांवर जाते. महाराष्ट्रातील ४६९७.६७ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या किमान १८ कंपन्यांविरुद्ध तपास करून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.तपासामधील समन्वयासाठी राज्यस्तरीय समित्या...पंजाबमधील पर्ल समूहातील कंपन्यांबाबत तपास अद्याप प्रगतिपथावर आहे. सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची रक्कम या कंपन्यांत गुंतवली गेली आहे. सहारा समूहाविरुद्ध दोन वर्षांपूर्वी सेबीने कारवाई सुरू केली होती. प. बंगाल, झारखंड, ईशान्येकडील राज्ये तसेच ओडिशापर्यंत ही व्याप्ती वाढविण्यात आली आहे. चिटफंड कंपन्या राज्य सरकारांच्या अखत्यारीत येत असून आरबीआय, सेबी आणि अन्य तपास संस्थांमध्ये अधिक समन्वय राखण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समित्या (एसएलसीसी) स्थापन केल्या आहेत. केंद्रीय तपास संस्थांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर महाराष्ट्र सरकारने घोटाळ्यातील रक्कम १० हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रत्यक्षात या राज्यातील घोटाळा ४० हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचा दावा चिटफंड घोटाळ्याविरुद्ध मोहीम छेडणारे भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.१६४ प्रकरणांचा तपास : एकदा तपास पूर्ण झाल्यानंतर घोटाळ्यातील रक्कम कितीतरी जास्त असल्याचा अंदाज लावता येईल. आरबीआयसह एसएफआयओने स्वतंत्र तपास चालविला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एसएफआयओकडे १६४ प्रकरणांचा तपास सोपविला आहे. ३१ डिसेंबर २०१५ रोजी या प्रकरणी ७८ कंपन्यांचा तपास पूर्ण करण्यात आला तर अन्य ४६ कंपन्यांविरुद्ध तपास सुरू आहे. शारदा, रोझ व्हॅली, सीमलेस, आय कोर आणि अन्य कंपन्यांविरुद्धचा तपास पूर्ण करण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. आणखी कंपन्यांसंबंधी तपास येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण केला जाऊ शकतो. तपास केला जात असलेल्या कंपन्यांसंबंधी डाट्याचे विश्लेषण करण्यासाठी एसएफआयओने संगणक न्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापन केली आहे. देशातील कंपन्यारोझ व्हॅली रिअलकॉम लिमिटेड (१९ कंपन्या) १०२८१आय क्रोे ग्रुप.... (१२ कंपन्या) ७३७५सीमलेस आऊटसोर्सिंग एलएलपी (३ कंपन्या) ३४९४शारदा/ ग्लोबल आॅटोमोबाईल्स लिमिटेड (१४ कंपन्या) २३९४शारदा/ बासील एक्स्प्रेस लिमिटेड (५ कंपन्या) १७२१यूआरओ ग्रुप.... १५००अल्केमिस्ट होल्डिंग लिमिटेड.... १०८८अर्थतत्त्व ५००आॅप्शन वन इंडस्ट्रीज लिमिटेड १०००युनीपे २ यू प्रॉडक्शन प्रा. लिमिटेड ७९२एनव्हीडी सोलर ५९५सीशोअर समूह ४७८एसजीआय रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनलसिस ४९४अ‍ॅनेक्स इन्फ्रास्ट्रक्चर २००विश्वमित्र इंटरनॅशनल इन्फ्रा १०६रिमेल समूह १००अन्य ५१ कंपन्या १०२३महाराष्ट्रातील कंपन्यासीमलेस आउटसोर्सिंग एलएलपी (३ कंपन्या) ३४९४आॅप्शन वन इंडस्ट्री लि. १०००विश्वमित्र इंटरनॅशनल इन्फ्रा १०६.७५सेल इंडस्ट्री १५.६१वासनकर वेल्थ मॅनेजमेंट १३इक्विनॉक्स इन्फ्राटेक १२.४७अँजेल ग्रुप १२आरबीएक्स लॅण्ड डेव्हलपर्स ११.९८ कोटीअन्य ८ कंपन्या ३१.८६ कोटीएकूण ४६९७.६७ कोटी