शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोदींच्या शपथविधीसाठी बंगालमधील हिंसेत मरण पावलेल्या कार्यकर्त्यांच्या नातलगांना आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 11:48 IST

पश्चिम बंगालमध्ये राजकिय हिंसेतून हत्या झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नातलगांचा यामध्ये समावेश आहे. या लोकांच्या राहण्याची आणि जेवनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान होणार आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील नामवंत लोकांना आमंत्रित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान ठार झालेल्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये राजकिय हिंसेतून हत्या झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नातलगांचा यामध्ये समावेश आहे. या लोकांच्या राहण्याची आणि जेवनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी बंगालमधील हिंसेत ठार झालेल्या मनू यांच्या मुलाने दिल्लीला जाण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी माझ्या वडिलांना ठार केले. आम्हाला आनंद आहे की, आम्ही दिल्लीला जात आहोत. आता आमच्या परिसरात शांतता असल्याचे मनू यांच्या मुलाने सांगितले. मनू हे भाजपचे कार्यकर्ते होते.

भाजपकडून ५४ कार्यकर्त्यांच्या नातलगांना शपथविधीसाठी बोलविण्यात आले आहे. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मैदान तयार करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. शपथविधीसाठी १६ जून २०१३ ते २६ मे २०१९ या कालावधीत राजकीय वादातून मरण पावलेल्या कार्यकर्त्यांच्या नातलगांना बोलविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.