शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

मुंबई, चेन्नईसह 'ही' शहरं बुडण्याचा धोका; ४ कोटी भारतीयांसाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 4:38 PM

वातावरण बदलाचा, तापमान वाढीचा मोठा फटका बसणार; कोट्यवधी भारतीयांवर मोठं संकट

वातावरण बदलाचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राच्या इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) ताज्या अहवालातून भारतासाठी अतिशय चिंताजनक माहिती समोर आली आहे. वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका भारताला बसेल असं आयपीसीसीचा अहवाल सांगतो. शतकाच्या शेवटापर्यंत भारतातील ४.५ ते ५ कोटी लोकांवर मोठं संकट असेल. मुंबई, चेन्नई, गोवा यासारखे समुद्र किनारी असलेले भाग बुडतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढत आहे. भारताच्या तीन बाजूंना समुद्र आहे. भारताला लाभलेला समुद्र किनारा ७,५१६ किलोमीटरचा आहे. या किनारपट्टी भागात वास्तव्यास असलेल्या कोट्यवधी लोकांना समुद्राची पाणी पातळी वाढल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 

सध्याच्या तापमानवाढीचा वेग लक्षात घेतल्यास मुंबई, चेन्नई, गोवा, विशाखापट्टणम, ओदिशा यांचा बराचसा भूभाग पाण्याखाली जाईल. या शहरांजवळ असलेल्या पाण्याचं तापमान ०.८ डिग्रीनं वाढल्यावर चक्रीवादळांची संख्या वाढेल. त्यांची तीव्रता वाढेल. वारंवार चक्रीवादळ येत राहतील. त्यामुळे मोठं नुकसान होईल. समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना याचा फटका बसत राहील.

समुद्राचं तापमान वाढत असल्याचा थेट परिणाम किनाऱ्यावर असलेल्या शहरांना सहन करावा लागेल. उष्णतेच्या लाटा येतील, मुसळधार पाऊस होईल. हवामान बदलांचा सर्वाधिक फटका भारताला बसणार असल्यानं काही भागांमध्ये परिस्थिती सहन करण्याच्या पलीकडे जाईल. दिल्ली, पाटणा, लखनऊ, हैदराबादमध्ये तापमान वाढेल. उष्णतेनं जीवाची काहिली होईल. थंडीच्या दिवसात पारा खूप घसरले. त्यामुळे थंडी असह्य होईल, असं आयपीसीसीचा अहवाल सांगतो.