शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

इरोम शर्मिला यांची लगीनघाई

By admin | Published: July 13, 2017 11:41 AM

मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - ईशान्य भारतातील नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि तेथे तैनात लष्कराला विशेषाधिकार देणारा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी तब्बल सोळा वर्षे संघर्ष करणाऱ्या इरोम या साऱ्या जगाला परिचित आहेत. त्यांच्याबद्दलची गोड बातमी समोर आली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. 16 वर्षे उपोषण करून मणिपूरच्या लोकांसाठी संघर्ष करणा-या इरोम यांनी ब्रिटिश नागरिक डेसमंड कॉटन्हो यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
बुधवारी ( 12 जुलै ) इरोमनं लग्नासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं कोडाईकनालमधील सब रजिस्ट्रार कार्यालयात जमा केली आहेत. द हिंदूनं दिलेल्या वृत्तानुसार, इरोमला रजिस्ट्रार कार्यालयात आपल्या लग्नासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जवळपास 2 तास लागले.  कदाचित इरोम व डेसमंडला लग्नासाठी आणखी काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सब रजिस्ट्रार राजेश यांनी सांगितले की, इरोम व डेसमंड यांना लगेचच लग्न करण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही. यामागे आंतरजातीय विवाह असल्याचे कारण त्यांनी सांगितले. राजेश यांनी सांगितले की, कायद्यानुसार आंतरजातीय विवाह हिंदू विवाह कायद्यांर्तगत होऊ शकत नाही. लग्नासाठी दोघांना विशेष विवाह कायदा अंतर्गत नोंदणी करावी लागेल.  यासाठी 30 दिवसांपर्यंत वेळ लागेल. 
 
लग्न नोंदणीच्या तारखेसंबंध पोलिसांनीही माहिती मागवली आहे. पोलीस इरोमवर ब-याच कालावधीपासून नजर ठेऊन आहेत. 
इरोम यांनी १६ वर्षे उपोषण करून मणिपूरच्या लोकांसाठी संघर्ष केला. त्यानंतर त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला; मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ आठ मते मिळाली होती, त्यामुळे नाराज इरोम यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा मनोदय बोलून दाखविला होता.  
 
विवाहाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मी विवाहाबाबत आई आणि अन्य कुटुंबीयांना कळवले आहे. विवाहानंतरही आपण लोकांसाठी लढत राहणार असून, पक्ष बळकट करण्याचाही निर्धार आहे. विवाहानंतरच्या जीवनाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, विवाहानंतर आपण तामिळनाडूत राहणार आहोत.
 
डेसमंड ब्रिटिश वंशाचे आहेत. त्याबाबत त्या म्हणाल्या की, आपले पती विवाहानंतर भारतीय व्हिसा घेऊन भारतात राहतील. डेसमंड यांचे कुटुंबीय गोव्याशी संबंधित होते. डेसमंड यांचा जन्म टांझानियात झाला. नंतर त्यांनी ब्रिटिश नागरिकत्व घेतले.
 
आणखी बातम्या वाचा
दरम्यान, मणिपूरच्या ‘आयर्न लेडी’ इरोम शर्मिला निवडणूक रिंगणात अपयशी ठरल्या. गेल्या वर्षी त्यांनी अचानक आपले बेमुदत उपोषण मागे घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते. लोकशाही पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपला हा लढा पूर्णत्वास नेण्याचा निर्धार त्यांनी केला होता. इरोम यांनी स्थापन केलेल्या पीपल्स रिसर्जेंस अ‍ॅण्ड जस्टिस अलायन्सने (पीआरजेए) आपले तीन उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. या तिघांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता. खुद्द इरोम यांना केवळ ९० मते पडली.  त्यामुळेच त्यांनी यापुढे कधीही निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले.