शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुलांभोवतीही ISI चा फास! कारवायांत सामील करण्याच्या कटाचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2023 14:37 IST

शस्त्र पुरवठ्यासाठी वापर

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये महिला व अल्पवयीन मुले, मुलींना अतिरेकी कारवायांत सामील करून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ व संदेशाचे वहन करण्याच्या अत्यंत धोकादायक कटाचा पर्दाफाश झाला आहे. गुप्तचर संस्था व सुरक्षा दलांनी अलीकडेच अतिरेक्यांच्या स्लीपर सेलवर कठोर कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि सीमेपलीकडील अतिरेकी संघटनांनी आपल्या कारवायांमध्ये महिला व बालकांना सॉफ्ट टार्गेट बनवल्याचे पुढे आले आहे.

दोन्ही देशांच्या सीमेवर सध्या असलेले शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा नियंत्रण रेषेपलीकडून (एलओसी) प्रयत्न होत असल्याने भारतीय सुरक्षा दलांना आता अधिक सतर्क राहावे लागणार असल्याचे श्रीनगर येथील चिनार कोरचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंह औजाला यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

चकमकींच्या प्रमाणातही घट 

  • काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले व चकमकींचे प्रमाण यावर्षी घटले. हा सकारात्मक संकेत आहे. स्थानिक लोकांचा दृष्टीकोनही खूप बदलला आहे. हाच कायम राखणे ही आता आमची जबाबदारी आहे. 
  • बदलत्या सुरक्षा वातावरणात आता आम्हालाही कार्यप्रणालीमध्ये बदल करावा लागणार आहे. जी-२० बैठक सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांनीही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

संदेशवहनासाठी पारंपरिक साधने

अतिरेक्यांनी कारवाया तडीस नेण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. बोलण्यासाठी किंवा संदेश पाठवण्यासाठी मोबाइलसारख्या साधनांपासून आता ते दूर राहत असून त्यासाठी पारंपरिक साधनांचा उपयोग करीत आहेत. महिला व बालके या जाळ्यात अडकू नयेत, यासाठी सरकार व प्रशासनाच्या सहकार्याने लष्कर जनजागरण मोहीम राबवत आहे.

३३ वर्षांतील अतिरेक्यांची संख्या सर्वांत कमी

भारताने राबवलेल्या इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशनने अतिरेक्यांचे कंबरडे मोडले आहे. बहुतांश अतिरेकी काश्मीर खोऱ्याच्या बाहेर गेले आहेत किंवा उर्वरित हालचालच करू शकत नाहीत. दहशतवादाचे अदृश्य रूप खरे चिंतेचे कारण आहे आणि आम्ही त्यावरही काम करत आहोत; परंतु, अंदाजानुसार अतिरेक्यांच्या संख्येत मागील ३३ वर्षांतील सर्वांत कमी आली आहे.

सुरक्षेत कसलीही कसूर नाही!

पाकिस्तानचे नाव न घेता लेफ्टनंट जनरल औजाला यांनी सांगितले की, काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर घुसखोरीचे प्रमाण कमी झाले; परंतु, पाकिस्तानच्या पीर पंजालच्या दोन्ही बाजूंनी व त्याचबरोबर पंजाबमध्येही घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. सुरक्षा अधिक कडक केली पाहिजे. आम्ही यात कसूर करणार नाही.

टॅग्स :Terrorismदहशतवाद