शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

इस्लामचा स्वीकार हीच खरी ‘घर वापसी’!

By admin | Published: January 06, 2015 2:39 AM

इस्लामचा स्वीकार करणे हीच खरी ‘घर वापसी’ आहे, असे वादग्रस्त विधान करून मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले.

आगीत तेल : एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींचे वादग्रस्त वक्तव्यहैदराबाद : इस्लाम हेच सर्व धर्मांचे मूळ आहे आणि म्हणूनच अन्य धर्मांच्या लोकांनी इस्लामचा स्वीकार करणे हीच खरी ‘घर वापसी’ आहे, असे वादग्रस्त विधान करून मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी धर्मांतरावरून सध्या देशात सुरू असलेल्या वादाच्या आगीत आणखी तेल ओतले आहे.‘ईद-ए-मिलाद’च्या पूर्वसंध्येस शनिवारी रात्री येथील ‘दारउस्सलाम’ या पक्ष मुख्यालयाबाहेर हजारो उपस्थितांना संबोधित करताना, संघ परिवाराने हाती घेतलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमाच्या संदर्भात, ओवैसी यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, प्रत्येक माणूस मुस्लिम म्हणूनच जन्माला येत असतो; पण त्याचे आई-वडील त्याचे धर्मांतर करतात. त्यामुळे असे धर्मांतर झालेले परधर्मीय जेव्हा इस्लाम ‘कुबूल’ करतील तेव्हाच खरी ‘घर वापसी’ होईल.इतर सर्व धर्मांच्या लोकांनी इस्लामचा स्वीकार करावा, पण त्यासाठी आमची सक्ती नाही, असे सांगताना ते म्हणाले की, आम्ही (इस्लाम) तुम्हाला पैसे देऊ शकत नाही; पण इहलोकीच्या आणि परलोकीच्या सुखाची हमी मात्र नक्की देऊ शकतो.संपूर्ण मानव वंशाचा जनक असलेला ‘आदम’ (अ‍ॅडम) (स्वर्गातून) पृथ्वीवर अवतरला तेव्हा सर्वप्रथम तो भारतात उतरला. त्यामुळे भारत ही आपली पितृभूमी आहे, असा दावाही ओवैसी यांनी केला.संघ परिवाराच्या ‘घर वापसी’वर मूग गिळून गप्प बसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टीका केली. निरपराध्यांची हत्या करणारे पाकिस्तानवासी दहशतवादी झकी-उर-रहमान लख्वी आणि हफीज सईद हे भारताचे शत्रू आहेत व त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी, असे सांगताना ओवैसी म्हणाले की, एमआयएमचे भारतीय जनता पक्षाशी राजकीय मतभेद असले तरी देशाच्या शत्रूंवर कारवाईच्या बाबतीत आमचा भाजपाला पाठिंबा आहे व ही भूमिका आपण संसदेतही स्पष्टपणे मांडली आहे. (वृत्तसंस्था)