शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

अरे व्वा! मजुरांना दीड लाख पगार; राहण्याचीही मोफत सुविधा; नेमकं काय आहे हे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 4:59 PM

कामगारांना अन्न आणि वैद्यकीय विम्याचे पैसे स्वतः द्यावे लागतील.

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी इस्रायलला सुमारे एक लाख कामगारांची गरज आहे. यासाठी इस्रायल सरकारने भारताकडून कामगारांची मागणी केली आहे. भारताने यासाठी इस्रायलला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. भारत सरकारच्या आदेशानुसार येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशातील सुमारे 40 हजार बांधकाम कामगारांना इस्रायलला पाठवले जाणार आहे.

कामगार व सेवा नियोजन विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व जिल्ह्यांना इच्छुक कामगारांची माहिती गोळा करण्यास सांगितले आहे. त्यानंतर चाचणी उत्तीर्ण झाल्यावर त्यांना इस्रायलला पाठवलं जाईल. हमास या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने सर्व पॅलेस्टिनी लोकांचे वर्क परमिट रद्द केले होते. अशा स्थितीत तेथे कामगारांचे मोठे संकट निर्माण झाले आहे. इस्रायलला बांधकाम क्षेत्रातील अनेक लोकांची गरज आहे.

यूपी सरकारने सुरू केली तयारी 

NSDC (नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) इंटरनॅशनल मार्फत इस्रायलला पाठवले जाईल. जाऊ इच्छिणाऱ्यांना कामाचा अनुभव तसेच उच्च माध्यमिक शिक्षण असणं आवश्यक आहे. त्यांची वयोमर्यादा 21 ते 45 या दरम्यान ठेवण्यात आली आहे.

इस्रायलला जाणाऱ्या कामगारांना दर महिन्याला 6100 इस्रायली न्यू शेकेल करेन्सी मिळेल. भारतीय चलनात ते सुमारे 1 लाख 37 हजार 260 रुपये असतील. बांधकाम, पेंटिंग, वेल्डिंग, शटरिंग, टाइल्स कारागीर इत्यादींसह इस्रायलला जाणाऱ्या सर्व कामगारांना राहण्यासाठी इस्रायल सरकार घर देईल. कामगारांना अन्न आणि वैद्यकीय विम्याचे पैसे स्वतः द्यावे लागतील.

कानपूरमध्ये, कामगार आयुक्त मार्कंडेय शाही यांच्या नेतृत्वाखाली, एक व्हर्च्युअल बैठक घेण्यात आली आहे आणि या संदर्भात सर्व कामगार आणि रोजगार जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. सर्व जिल्ह्यांना इस्रायलला जाण्यास इच्छुक आणि पात्र असलेल्या बांधकाम कामगारांचा डेटा गोळा करण्यास सांगितले आहे.

चाचणीद्वारे केली जाईल निवड 

एनएसडीसीच्या माध्यमातून त्यांची चाचणी केली जाईल. निवडलेल्या कामगारांना प्रशिक्षण देऊन इस्रायलला पाठवले जाईल. त्याच्या तयारीसाठी अतिरिक्त कामगार आयुक्त कल्पना श्रीवास्तव यांनी एक टीम तयार केली आहे. मोबाईल क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. अर्ज येताच ते पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश