शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा लोकसभेत गाजला, अखिलेश यादव यांनी योगी सरकारला घेरले; राजीनाम्याची मागणी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:47 IST

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज लोकसभेत महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित केला.

प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. महाकुंभ दररोज नवीन बातम्या समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेवरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज लोकसभेत या मुद्द्यावरुन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित केले. चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरुन खासदार यादव यांनी योगी सरकारला घेरले आहे.

BMC Budget 2025: मुंबई Eye प्रोजेक्ट, फाइव्ह स्टार हॉटेल अन् बरंच काही... मुंबईचं ७४ हजार कोटींचं 'श्रीमंत' बजेट सादर!

महाकुंभातील चेंगराचेंगरी आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी जाहीर करण्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी लोकसभेत भाजप सरकारवर हल्लाबोल केला. यादव म्हणाले की, मला वृत्तवाहिनीवरून कळले की महाकुंभात १०० कोटी लोकांच्या आगमनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मग हा अपघात कसा झाला?, असा सवालही त्यांनी केली. जर हे चुकीचे असेल तर मी तुम्हाला माझा राजीनामा देऊ इच्छितो, असंही ते म्हणाले. 

खासदार अखिलेश यादव म्हणाले, "सरकार सातत्याने अर्थसंकल्पीय आकडेवारी देत ​​आहे. आकडेवारी देण्यापूर्वी, महाकुंभात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारीही द्यावी. या घटनेबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

अखिलेश म्हणाले की, महाकुंभ आपत्ती व्यवस्थापन आणि हरवलेले आणि सापडलेले या केंद्राची जबाबदारी लष्कराकडे सोपवावी. महाकुंभ घटनेतील मृतांची आकडेवारी, जखमींवर उपचार, औषधे, डॉक्टर, अन्न, पाणी आणि वाहतुकीच्या उपलब्धतेची आकडेवारी संसदेत मांडली पाहिजे, असंही यादव म्हणाले.

'कठोर कारवाई केली पाहिजे'

महाकुंभ दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली पाहिजे आणि सत्य लपवणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, असंही अखिलेश यादव म्हणाले. जर चूक नव्हती तर आकडे का दाबले, लपवले का?, असा सवालही त्यांनी केला. 

अखिलेश यादव म्हणाले, या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला आहे, याची माहिती मिळाली, मृतदेह शवागारात आणि रुग्णालयात पडले आहेत, तेव्हा सरकारने त्यांचे हेलिकॉप्टर फुलांनी भरले आणि त्यांच्यावर फुले वर्षाव केली. ही कसली सनातनी परंपरा आहे? देवालाच माहिती." "किती लोकांचा मृत्यू झाला आहे?" चप्पल, कपडे आणि साड्या आजूबाजूला पडल्या होत्या आणि त्या सर्व जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर ट्रॉलींनी उचलल्या होत्या. त्या कुठे फेकल्या हे कोणालाही माहिती नाही. सर्व काही लपविण्यासाठी, असे ऐकू येत आहे की काही दबाव जेणेकरून त्यांच्या बातम्या बाहेर येऊ नयेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabhaलोकसभा