शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

विधानसभा अध्यक्षपदासाठी कोण हा मुद्दा चर्चेत नव्हताच; काँग्रेसची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 07:07 IST

काँग्रेसची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक : संघटनात्मक विषयावर चर्चा

- व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या शुक्रवारी येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी पक्षातर्फे कोण असेल हा विषय नव्हता. प्रसारमाध्यमांत मात्र या उलट बातम्या होत्या.  या बैठकीला पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे विश्वासू आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस (संघटना प्रभारी) के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

या बैठकीत अध्यक्षपदाचा विषय चर्चेत होता का, असे विचारले असता पाटील ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, ‘नाही, त्याची चर्चा झाली नाही. बैठक महाराष्ट्रातील संघटनात्मक विषयांवर घेण्यात आली होती.’ राज्यात स्वबळावर लढणार का, यावर पाटील म्हणाले की, तो विषय २०२४ मध्ये समयोचित आहे (२०२४ मध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणूक आहे).

राज्यात महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये सत्तेचे वाटप जसे ठरले आहे त्यानुसार अध्यक्षपद काँग्रेसला दिले गेले आहे आणि काँग्रेसचे नाना पटोले हे अध्यक्ष बनले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ते पद सोडले व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बनले. तेव्हापासून पक्षाला त्यांच्या वारसावर निर्णय घेता आलेला नाही. याशिवाय राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेला अध्यक्ष असेल की नाही हेदेखील स्पष्ट नाही. राज्य आणि मुंबई प्रांतीय काँग्रेसचा भर ‘एकला चलो रे’ आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणावा यावर असताना अखिल भारतीय काँग्रेस समिती त्याला फार महत्त्व देत नाही. 

भाजप निवडणूक जिंकणे अशक्य

‘जर आम्ही (काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) एकत्र राहिलो, तर बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे आणि इतर महानगरपालिकांची आगामी निवडणूक भाजपला जिंकता येणार नाहीत,’  असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. हा नेता म्हणाला की, ‘पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला याची जाणीव आहे.’

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी