शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

पोलिसांना महिलांची तक्रार घेणे अनिवार्य

By admin | Published: March 12, 2015 12:06 AM

महिलांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य असल्याची ग्वाही देतानाच देशभरातील सर्व पोलीस ठाण्यांना महिलांची तक्रार दाखल करून घेणे

नवी दिल्ली : महिलांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य असल्याची ग्वाही देतानाच देशभरातील सर्व पोलीस ठाण्यांना महिलांची तक्रार दाखल करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे बुधवारी देण्यात आली.गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले की, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारतर्फे अनेक पावले उचलण्यात आली आहेत. याअंतर्गतच सर्व पोलीस ठाण्यांना महिलांची तक्रार अनिवार्यपणे नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिलांविरुद्ध दिल्लीत वाढत्या गुन्ह्यांबाबत विचारलेल्या मूळ प्रश्नाच्या उत्तरात गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत सुमारे ३३२.९६ कोटी रुपये खर्चून ८५ सार्वजनिक ठिकाणी ५.२०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांत बलात्काराच्या २९० गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली. चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, दिल्लीत यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात बलात्काराची २९१, तर हल्ल्याची ६६२ प्रकरणे नोंदविण्यात आली. विमा विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची शक्यताकाँग्रेसने वादग्रस्त विमा कायदा दुरुस्ती विधेयकाला आपला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. हे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांमधील एफटीआय मर्यादा २६ वरुन वाढवून ४९ टक्के करण्याची तरतूद असलेल्या या विधेयकाला लोकसभेने गेल्या आठवड्यातच मंजुरी दिली होती. डाव्या पक्षांनी विरोध करण्याची घोषणा केली आहे. सभागृहाचे नेते व वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेतील सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात काँग्रेसने हे पाठिंब्याचे संकेत दिल्याचे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)