शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

आम्ही निर्दोष मुक्त करणे महत्त्वाचे -सुप्रिम कोर्ट

By admin | Published: February 20, 2016 2:55 AM

सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष ठरविणे महत्त्वाचे आहे. येथे निर्दोष ठरविण्यात आल्यास त्यावर एकदाच आणि कायमचे शिक्कामोर्तब होईल, असे स्पष्ट करीत न्या. जे.एस. खेहार आणि सी. नागप्पन यांच्या

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष ठरविणे महत्त्वाचे आहे. येथे निर्दोष ठरविण्यात आल्यास त्यावर एकदाच आणि कायमचे शिक्कामोर्तब होईल, असे स्पष्ट करीत न्या. जे.एस. खेहार आणि सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सलमान खान याला २००२ च्या ‘हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी’ नोटीस बजावली.उच्च न्यायालयाने दोन मुद्यांवर चूक करीत सलमानची निर्दोष मुक्तता केली असल्याचे अटर्नी जनरल मुकुल रोहतगी महाराष्ट्र सरकारची बाजू मांडताना नमूद केले. मुंबईत २००२ साली सलमानच्या कारखाली पदपथावरील एक जण चिरडून ठार झाला होता. न्या. जे.एस. खेहार यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकारच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर नोटीस जारी करीत सलमानला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला. सलमानच्या वकिलांनी उत्तरासाठी सहा आठवड्यांची मुदत मागितली आहे. सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्याला निर्दोष ठरविले. महाराष्ट्र सरकार आणि पीडित कुटुंबाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पुरावे नाहीत- सिब्बल...सलमानला कनिष्ठ न्यायालयाने केवळ एका साक्षीच्या आधारावर दोषी ठरविले होते. त्यावर अवलंबून राहता येत नाही, सलमान कार चालवत असल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, असे युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले. सिब्बल यांनी केवळ एका साक्षीदाराचा उल्लेख केला असला तरी घटनेवेळी अनेक साक्षीदार होते. त्यांनी सलमानला चालकाच्या सीटवर बघितले होते, असे रोहतगी म्हणाले. (वृत्तसंस्था)