शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

न्यायालयांना मंदिर अन् न्यायाधीशांना देवासमान मानणे धोक्याचे; चंद्रचूड यांचे महत्वाचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 16:45 IST

न्यायालय हे न्यायाचे मंदिर आहे, असे मला जेव्हा सांगितले जाते तेव्हा मला संकोच वाटतो. - सीजेआय

महाराष्ट्राचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी लोक न्यायालयांना आणि न्यायाधीशांना मंदिर-देवासमान मानत असल्यावरून मोठे वक्तव्य केले आहे. हे सर्वात जास्त धोक्याचे असल्याचे चंद्रचूड म्हणाले आहेत. 

कोलकातामधील राष्ट्रीय न्यायिक अकादमीच्या परिषदेत ते बोलत होते. अनेकदा आपल्याला आदरणीय किंवा लॉर्डशिप किंवा लेडीशिप म्हणून संबोधले जाते. न्यायालय हे न्यायाचे मंदिर आहे असे जेव्हा लोक म्हणतात तेव्हा ते खूप धोक्याचे असते. त्या मंदिरांमध्ये आपण स्वत:ला देव म्हणून पाहू लागणे हे फार धोकादायक आहे. न्यायाधीशांचे काम सार्वजनिक हिताचे काम करणे आहे, देव बनण्याचे नाही, असे चंद्रचूड यांनी सांगितले. 

आयएएनएस वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. यानुसार सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, न्यायालय हे न्यायाचे मंदिर आहे, असे मला जेव्हा सांगितले जाते तेव्हा मला संकोच वाटतो. कारण मंदिरात न्यायाधीशांना देवाच्या दर्जाचे मानले जाते. जेव्हा तुम्ही स्वत:ला लोकांची सेवा करणारे मानता तेव्हा तुम्ही करुणा, सहानुभूती, न्याय करण्याची भावना बाळगू शकता. परंतू दुसऱ्यांसाठी निर्णयात्मक होऊ शकत नाही. 

एखाद्या गुन्हेगारी खटल्यात एखाद्याला शिक्षा सुनावतानाही न्यायाधीश सहानुभूतीच्या भावनेने तसे करतात कारण एका माणसाला ही शिक्षा दिली जात असते. माझ्या मते या घटनात्मक चारित्र्याच्या संकल्पना केवळ सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठीच नव्हे तर जिल्हा न्यायव्यवस्थेसाठीही महत्त्वाच्या आहेत. कारण सामान्यांची न्यायपालिकेतील भागीदारी ही जिल्हा न्यायालयांपासून सुरु होते, असे सरन्यायाधीश यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय