शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

अत्याधुनिकीकरणामुळे आयटी क्षेत्रात ६.४ लाख नोक-यांची होणार कपात

By admin | Published: July 05, 2016 3:53 PM

भारतात सर्वाधिक रोजगार निर्मिती आयटी क्षेत्रात होते. पण पुढच्या काही वर्षात आयटीमध्ये रोजगार घटण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - भारतात सर्वाधिक रोजगार निर्मिती आयटी क्षेत्रात होते. पण पुढच्या काही वर्षात आयटीमध्ये रोजगार घटण्याची शक्यता आहे. वाढत्या अत्याधुनिकीकरणामुळे २०२१ पर्यंत भारतात माहिती-तंत्रज्ञान उद्योगात (आयटी) ६.४ लाख नोक-या कमी होतील असे अमेरिका स्थित एचएफएस कंपनीने म्हटले आहे. 
 
२०२१ मध्ये जगभरात आयटी उद्योगामध्ये नोक-या नऊ टक्क्यांनी कमी झालेल्या असतील असे एचएफएस कंपनीने म्हटले आहे. भारतासह, फिलीपाईन्स, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या देशांना फटका बसेल. भारतात आयटी उद्योगाचे प्रतिनिधीत्व करणा-या नॅसकॉम या संघटनेने मात्र दुसरी बाजू मांडली आहे. 
 
नव्या तंत्रज्ञानाने नोक-यांची निर्मिती होते हे एचएफएसने आपल्या अहवालात ध्यानात घेतलेले नाही असे नॅसकॉमने म्हटले आहे. अत्याधुनिकीकरणाचा काही प्रमाणात परिणाम होईल पण नव्या तंत्रज्ञानामुळे वेगवेगळया क्षेत्रात रोजगार निर्मिती होते असे नॅसकॉमचे म्हणणे आहे.