शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

आयटीतील लाखो होतील बेरोजगार !

By admin | Published: July 06, 2016 1:05 AM

स्वयंचलित उपकरणांचे चलन वाढत चालल्यामुळे २0२१ सालापर्यंत आयटी क्षेत्रातील ६.४ लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : स्वयंचलित उपकरणांचे चलन वाढत चालल्यामुळे २0२१ सालापर्यंत आयटी क्षेत्रातील ६.४ लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तुलनेने कमी कुशल असणाऱ्या लोकांनाच नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या ‘कुशल भारत’ मोहिमेला यामुळे धक्का लागणार आहे. एचएसएफ रिसर्च या संस्थेने हा अभ्यास केला आहे. अभ्यासांती जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारत आणि विदेशात मिळून आयटी क्षेत्रातील ९ टक्के नोकऱ्या यंत्रे संपवून टाकणार आहेत. यंत्रांमुळे गमावल्या जाऊ शकणाऱ्या या नोकऱ्यांची एकूण संख्या १.४ दशलक्ष इतकी आहे. एचएफएसने म्हटले की, कमी कुशल रोजगारांच्या उपलब्धतेत ३0 टक्क्यांनी घट होईल. याच वेळी मध्यम कुशल रोजगारांत ८ टक्क्यांची, तर उच्च प्रमाणात कुशल रोजगारांत ५६ टक्क्यांची वाढ होईल. (वृत्तसंस्था)कौशल्यावर लक्ष केंद्रित करायला हवेनासकॉमच्या वरिष्ठ उपाध्यक्ष संगीता गुप्ता यांनी सांगितले की, नव्याने निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांचा हिशेब एचएफएसच्या अभ्यासात घेतलेला दिसत नाही. स्वयंचलितीकरण आणि रोबोटिक्स यामुळे नेमका काय नफा-तोटा झाला, हे नेमकेपणे कोणीच पाहू शकत नाही. स्वयंचलित उपकरणांचा काही प्रमाणात परिणाम होतो. तथापि, नव्या तंत्रज्ञानाने नोकऱ्यांची निर्मितीच होते. प्रमाणापेक्षा कौशल्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. अमुक इतक्या नोकऱ्या संपणार, असे म्हणणे चूक आहे. नोकऱ्या अन्यत्र निर्माण होतच असतात.बीपीओ उद्योगासमोर संकट...स्वयंचलितीकरणाचा फटका बीपीओ क्षेत्रास मोठ्या प्रमाणात बसेल. बीपीओ संस्था अँटवर्क्सचे सीईओ आशिष मेहरा यांनी सांगितले की, रोबोटिक प्रोसेस आॅटोमेशनमुळे म्हणजेच रोबोटकृत स्वयंचलित प्रक्रियेचा अवलंब वाढल्यामुळे येत्या दोन वर्षांत बीपीओ उद्योगासमोर संकट उभे राहील. कपातच नव्हे तर; नवे पदेही होणार तयारएचएफएस रिसर्चचे सीईओ फिल फ्रेश्ट यांनी सांगितले की, कमी गुणवत्तेची ३0 टक्के पदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असल्याचे आम्ही नेमकेपणाने टिपले आहे. आगामी पाच वर्षांत ही पदे रद्द होत राहतील. त्याच वेळी मध्यम आणि उच्च गुणवत्तेची गरज असलेली नवी पदे तयार होतील. एचएफएसने १,४७७ कंपन्यांतील नियुक्त्यांचा कल अभ्यासून हा निष्कर्ष काढला आहे. 30%पदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली