शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ती एक घोडचूक! नेहरूंनी योग्य निर्णय घेतला असता तर Pok भारताचा भाग असता - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 16:37 IST

आज लोकसभेत बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, जम्मू काश्मिरमधील कलम ३७० हटवल्याने काही लोक नाराज झाले.

गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन नवीन विधेयकांवर चर्चा केली. यावर बोलताना अमित शहा यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. आपल्या भाषणात शाह म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याने काही लोक नाराज झाले आहेत. 'जम्मू आणि काश्मीर आरक्षण दुरुस्ती कायदा २०२३ आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक २०२३ ही सत्तर वर्षांपासून अन्याय, अपमान आणि दुर्लक्ष झालेल्यांना न्याय देण्यासाठी विधेयके आहेत. 

शाह म्हणाले की, कलम ३७० तिथल्या ४५ हजार लोकांच्या मृत्यूला कारणीभूत आहे, जे मोदी सरकारने उखडून टाकले आहे. यावेळी शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंमुळे पाकव्याप्त काश्मीरची सर्वात पहिली समस्या सर्वप्रथम उद्भवली. संपूर्ण काश्मीर आपल्या हातात न येता युद्धबंदी लागू केली गेली, अन्यथा तो भाग काश्मीरचाच राहिला असता. शहा यांच्या या विधानावर सभागृहात गदारोळ झाला, त्यानंतर विरोधकांनी लोकसभेतून वॉकआउट केला.

यावेळी बोलताना शाह म्हणाले की, विधेयकाच्या नावाशी आदर आहे, फक्त तेच लोक ते पाहू शकतात, ज्यांना मागे राहिलेल्यांचे बोट धरून त्यांना सहानुभूतीने पुढे जायचे आहे. ते लोक हे समजू शकत नाहीत, जे त्याचा वापर व्होट बँकेसाठी करतात.

'कलम ३७० हटवल्याने काही लोक नाराज'

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी हे असे नेते आहेत, ज्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आणि ते देशाचे पंतप्रधान झाले आहेत, त्यांना मागासलेल्या लोकांच्या वेदना माहीत आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याने काही लोक नाराज झाले आहेत. ३७० हटवल्याने काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहू लागतील, रक्ताच्या नद्या सोडा, दगडफेक करण्याची कोणाची हिंमत नव्हती, असे अमित शहा म्हणाले.

शाह म्हणाले, कलम ३७० आधीच हटवायला हवे होते. १९८० नंतर दहशतवादाचे युग आले आणि ते अतिशय भयावह दृश्य होते. जे लोक या भूमीला आपला देश मानून राहात होते, त्यांना हाकलून दिले गेले आणि त्यांची कोणी पर्वा केली नाही. ते थांबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती ते लोक इंग्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत होते. काश्मिरी पंडित विस्थापित झाले तेव्हा त्यांना त्यांच्याच देशात निर्वासित म्हणून जगण्यास भाग पाडले गेले. सध्याच्या आकडेवारीनुसार, सुमारे ४६,६३१ कुटुंबे आणि १,५७,९६८ लोक त्यांच्याच देशात विस्थापित झाले आहेत. हे विधेयक त्यांना अधिकार देण्यासाठी आहे, हे विधेयक त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आहे, असे अमित शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदcongressकाँग्रेसBJPभाजपा