शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

लग्नाला दोन वर्षे लोटली! नवऱ्याने सुहागरातच केली नाही; पत्नीने सात कलमे दाखल केली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 11:49 AM

शरीर संबंध हे वैवाहिक आयुष्याची गरज असल्याचे न्यायालयांनी वेळोवेळी नमूद केलेले आहे. तसेच त्यास वारंवार नकार देणे यास क्रुरता असल्याचे म्हटले आहे.

शरीर संबंध हे वैवाहिक आयुष्याची गरज असल्याचे न्यायालयांनी वेळोवेळी नमूद केलेले आहे. तसेच त्यास वारंवार नकार देणे यास क्रुरता असल्याचे म्हटले आहे. अनेक प्रकरणांत न्यायालयाने या कारणावरून घटस्फोटांना परवानगी देखील दिली आहे. परंतु, लग्नानंतर दोन वर्षे सुहागरातच केली नाही तर... मुझफ्फरपूरमध्ये असा प्रकार घडला आहे. 

एका महिलेने पतीने एकदाही शरीर संबंध ठेवला नाही म्हणून पोलिसांत धाव घेत एफआयआर दाखल केला आहे. महिला पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांना बोलविण्यात आले आहे. आता पोलीस या प्रकरणाच्या चौकशीत गुंतली आहे. पीडिता ही वैशाली जिल्ह्यातली लालगंज पोलीस ठाणे हद्दीत राहणारी असून तिचा पती अहियापुर पोलीस ठाणे हद्दीत राहतो. 

एफआयआरनुसार तिचे लग्न मे २०२१ मध्ये झाले होते. परंतु पतीने दोन वर्षे शरीर संबंधच ठेवले नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. तेव्हा सासरच्यांना सांगितले असता त्यांनी पतीला समजावले नाही. पतीला सेक्स का करत नाही असे विचारले असता तो नेहमी शिवीगाळ करायचा आणि मारहाण करायचा. माहेरी जाते असे म्हटले तर घराबाहेर पाय ठेवलास तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी देत होता. अखेर आजोबांची तब्येत बिघडलीय असे सांगून जीव वाचवत माहेरी पोहोचली आहे. तेव्हापासून पती आणि सासरचे लोक सतत धमक्या देत असल्याचे या महिलेने म्हटले आहे. 

महिला पोलीस ठाणा प्रमुख आदिती कुमारी यांनी सांगितले की, पतीला व त्याच्या कुटुंबाला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते मान्य करत नव्हते. पती आणि सासरचे लोक उलट पीडितेवरच दबाव आणू पाहत होते. अखेर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 341, 323, 498A, 379, 504, 506, 34 अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे.  

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस