शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
3
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
4
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
5
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
7
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
8
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
9
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
10
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
11
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
12
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
13
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
14
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
16
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
17
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
18
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
19
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
20
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन

म्हणे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त 60 मिनिटांत

By admin | Published: March 01, 2017 10:19 AM

जगातील सर्वात वेगवान ट्रेन बनवणारी कंपनी हायपरलूप वनने दिल्ली ते मुंबई हे अंतर केवळ 55 मिनिटात कापता येईल असा दावा केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - दिल्लीहून मुंबईचा प्रवास फक्त 60 मिनिटांत आणि मुंबई ते चेन्नई प्रवास 30 मिनिटांत पुर्ण होऊ शकतो का ? तसं पाहायला गेलं तर विमानालाही यापेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र मंगळवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एका अशा टेक्नॉलॉजीवर चर्चा केली आहे ज्यामुळे हे सत्यात उतरु शकतं आणि तुम्ही बुलेट ट्रेनपेक्षाही जास्त वेगाने प्रवास करु शकता. अमेरिकेतील कंपनी 'हायपरलूप वन' भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत असून त्यांनी दावा केला आहे की चुंबकीय आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान आणि प्रवाशांना अत्यंत वेगाने एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचवलं जाऊ शकतं. 
 
 (सुपरफास्ट! दुबई ते अबुधाबी प्रवास अवघ्या 12 मिनिटांत)
 
हायपरलूप बनवण्यासाठी उत्सुक असलेल्या कंपनीने भारतात पाच मार्ग सुचवले आहेत. यामध्ये बंगळुरू ते चेन्नई, बंगळुरू ते तिरुवअनंतपुरम, मुंबई ते चेन्नई आणि बंगळुरू ते चेन्नई या मार्गांचा समावेश आहे.
 
जगातील सर्वात वेगवान ट्रेन बनवणारी कंपनी हायपरलूप वनने ‘भारतासाठी हायपरलूप वन व्हिजन’ या संमेलनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. संमेलनात सादरीकरणावेळी कंपनीने दिल्ली ते मुंबई हे अंतर केवळ 55 मिनिटात कापता येईल, असा दावा केला. 
 
'अनेक नवीन तंत्रज्ञान विकसित होत असून, आम्ही त्याकडे लक्ष देत आहोत', असं सुरेश प्रभू यांनी कार्यक्रम संपल्यानंतर सांगितलं आहे. 'मुंबई ते दिल्ली 60 मिनिटं आणि चेन्नई ते मुंबई फक्त 30 मिनिटांत प्रवास करण्याबाबत विचार केला जात आहे. भारतीय रेल्वे आधुनिकीकरण आणि वेग वाढवण्यावर जोर देत आहे. वेगावर आमचं मुख्य लक्ष असून तो वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत', असं सुरेश प्रभू बोलले आहेत.