शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
2
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
3
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
4
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...
5
एका शेअरवर ₹११७ चा डिविडेंड देतेय कंपनी, रेकॉर्ड डेट आता जास्त दूर नाही; पाहा कोणता आहे शेअर?
6
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
7
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
8
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
9
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
10
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
11
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
12
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
13
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
14
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
15
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
16
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
17
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
18
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
19
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
20
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?

जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर उपोषण सोडले; महापंचायतमध्ये घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 19:50 IST

शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून उपोषण संपवण्यात आल्याचे डल्लेवाल म्हणाले. काही दिवसापासून त्यांना शेतकऱ्यांनी उपोषण सोडण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांच्या एमएसपी आणि इतर मागण्यांसाठी १३१ दिवसांपासून उपोषण करणारे संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर आज उपोषण थांबवले आहे. फतेहगढ साहिब येथील सरहिंद धान्य बाजारात शेतकऱ्यांच्या महापंचायतीत त्यांनी ही घोषणा केली आणि पाणी घेतले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून उपोषण संपवण्यात आल्याचे डल्लेवाल यांनी जाहीर केले. 

गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी डल्लेवाल यांनी २६ नोव्हेंबर २०२४ पासून उपोषण सुरू केले होते. काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते.

'इंग्रजीत स्वाक्षरी करता, तेव्हा कुठे जातो भाषेचा अभिमान?', पीएम मोदींचा सीएम स्टॅलिनवर निशाणा

४ मे रोजी चंदीगडमध्ये शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री चौहान  यांनी सांगितले होते. यापूर्वी, पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळवले होते की डल्लेवाल यांनी त्यांचे उपोषण सोडले आहे, शेतकरी संघटनांनी सरकारचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले होते.

जगजीत सिंग यांनी श्री फतेहगड साहिब येथील शेतकऱ्यांच्या महापंचायतीलाही संबोधित केले. त्यांनी सांगितले की एम.एस.पी. आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत त्यांचा लढा सुरूच राहील. डल्लेवाल म्हणाले की, सरकारने आमच्यावर मोठा हल्ला केला आहे. चळवळ सुरू आहे, सुरू राहील आणि शेवटपर्यंत सुरू राहील. पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असंही डल्लेवाल म्हणाले.

डल्लेवाल म्हणाले की, पंजाब सरकारने केंद्र सरकारसमोर झुकले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केवळ शेतकऱ्यांवर हल्ला केला नाही तर संपूर्ण पंजाबच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. या सरकारला मुलींचा, मातांचा किंवा मोठ्यांचा आदर करण्याची जाणीव नाही. आंदोलन सुरूच आहे. पुढे काय होईल हे मला माहित नाही. शेतकऱ्यांनी अपील केले होते, म्हणून मी उपोषण सोडत आहे, असंही डल्लेवाल म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीPunjabपंजाब