शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

प्रेरणादायी! परीक्षेत 19 वेळा झाला नापास पण नंतर केला जिद्दीने अभ्यास; आता झाला अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 3:34 PM

काही लोक परीक्षेत नापास झाले असले तरी आज मोठमोठ्या पदांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - सध्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल समोर येत आहेत. प्रत्येकाला आपल्या मार्कांची आणि पास-नापास होण्याची चिंता असते. निकालानंतर सर्वजण टॉपर्सबद्दल बोलतात. ते त्यांच्या मार्कशीट शेअर करतात, पण परीक्षेत कमी मार्क्स मिळवणाऱ्या मुलांबद्दल कोणीच काही बोलत नाही. त्यामुळेच अनेक वेळा तणावाखाली असलेली मुले टोकाचं पाऊल उचलतात. याच दरम्यान अनेक प्रेरणादायी घटना या पुढे येत असतात. काही लोक परीक्षेत नापास झाले असले तरी आज मोठमोठ्या पदांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. 

परीक्षेमध्ये वारंवार अपयश आले पण एका तरुणाने हार नाही मानली आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. परीक्षेत तब्बल 19 वेळा नापास झाला पण नंतर जिद्दीने अभ्यास केला आणि आता अधिकारी झाल्य़ाची घटना घडली आहे. राजस्थानमधील एका तरुणाने आरएएस (RAS) परीक्षेत 55 वा क्रमांक पटकावला आहे. दलपत सिंह असं या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरएएस दलपत सिंह हे मोहनलाल सुखाडिया विद्यापीठात अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ते एक-दोन नव्हे तर 19 वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये नापास झाले. 

दहावीत त्यांना कमी मार्क मिळाले होते तर बारावीत दोनदा नापास झाले. त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांनी परीक्षा दिली. कॉलेजमध्येही ते अनेकदा नापास झाले. PMT, BSTC, PET, Agriculture Department, STE अशा अनेक परीक्षा दिल्या पण सगळ्यात नापास झाले. याच दरम्यान दलपत सिंह यांचा बालपणीचा मित्र आयएएस झाला. यानंतर त्यांनी आयएएस होण्याचा निर्णयही घेतला. जोरदार तयारी केली आणि आता आरएएस परीक्षा-2008 मध्ये 55 वा क्रमांक मिळवला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.