शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जयपूर अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, 40 गाड्यांचा कोळसा; मृतांचा आकडा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:46 IST

कारमध्ये बसलेले लोक काही सेकंदातच जळून खाक झाले.

Jaipur Accident : राजस्थानच्या जयपूरमध्ये आज एक भीषण अपघात घडला. जयपूर ते अजमेर महामार्गावर सकाळी 6.30 च्या सूमारास गॅस टँकर आणि ट्रकच्या अपघातात अनेकजण होरपळले, त्यातील 11 जणांचा मृत्यू झाला, तर इतर गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात अचानक झाल्यामुळे कुणालाही काही करता आले नाही. या घटनेत रस्त्यावरील अनेक वाहने आणि रस्त्याच्या कडेला असलेला कारखाना जळून खाक झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-अजमेर महामार्गावरील दिल्ली पब्लिक स्कूलसमोर एलपीजीने भरलेला टँकर अजमेरहून जयपूरच्या दिशेने येत होता. यादरम्यान टँकरने यू टर्न घेतला. इतर वाहनांनी ब्रेक लागला आणि टँकर जाण्याची वाट पाहत होते. इतक्यात जयपूरहून भरधाव ट्रक आला आणि टँकरला धडकला. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, टँकरमधून गॅस गळती झाली आणि क्षणात गॅसने पेट घेतला. वायू वेगाने पसरल्याने आगही तितक्याच वेगाने पसरली आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर व्यापला गेला.

लोकांना काय झाले, हे समजेपर्यंत संपूर्ण परिसर आगीच्या विळख्यात आला होता. कारमध्ये बसलेले लोक काही सेकंदातच जळून खाक झाले. हळूहळू महामार्गावरुन जाणारी इतर अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी आली. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू झाले. या भीषण अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीररित्या भाजले गेले आहेत. जखमींवर सवाई मानसिंग रुग्णालयात उपचार सरू आहेत. जखमी 32 पैकी 15 रुग्ण 50 टक्क्यांहून अधिक भाजलेले आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.

40 हून अधिक वाहनांना आग या घटनेनंतर काही सेकंदात एकामागून एक 40 कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. सुरुवातीला ही आग 200 मीटर परिसरात पसरली पण नंतर ती सुमारे 1 किलोमीटर परिसरात पसरली. रस्त्याच्या कडेला अलेल्या पाईप फॅक्टरीलाही आग लागली. विशेष म्हणजे, जिथे हा भीषण अपघात झाला, तिथून अवघ्या 100 मीटर अंतरावर कच्च्या तेलाची पाइपलाइन जात होती. सुदैवाने आग तिकडे गेली नाही.

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानDeathमृत्यूfireआग