शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

'PoK शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण, पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील', राजनाथ सिंहांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 21:15 IST

'पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पीओकेच्या भूमीचा वापर करत आहे. आजही तेथे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. '

Rajnath Singh : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीओके आणि पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 9व्या सशस्त्र सेना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, जम्मू-काश्मीर पीओकेशिवाय अपूर्ण आहे. पीओके पाकिस्तानचा नाही, तर भारताचा भूभाग आहे. पीओकेच्या जमिनीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी केला जातोय. पीओकेमध्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवली जातात, असा दावा त्यांनी केला. 

पीओकेमध्ये दहशतवादी केंद्रेजम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे माजी सैनिकांना संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पीओकेच्या भूमीचा वापर करत आहे. आजही तेथे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. सीमेजवळील भागात लाँच पॅड बनवण्यात आले आहेत. भारत सरकारला याची संपूर्ण माहिती आहे. पाकिस्तानने पीओकेत दहशतवादी कारवाया थांबवाव्या, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

भारत नेहमीच पाकिस्तानला वरचडसंरक्षण मंत्री पुढे म्हणतात, भारत आणि पाकिस्तानमध्ये 1965 मध्ये अखनूर येथे युद्ध झाले होते. पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्न हाणून पाडण्यात भारताला यश आले. इतिहासातील सर्व युद्धांमध्ये भारताने नेहमीच पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तान 1965 पासून अवैध घुसखोरी आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. आपल्या मुस्लिम बांधवांनी दहशतवादाविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आजही भारतात घुसणारे 80% पेक्षा जास्त दहशतवादी हे पाकिस्तानचे आहेत. सीमेपलीकडील दहशतवाद 1965 मध्येच संपुष्टात आला असता, परंतु तत्कालीन केंद्र सरकार योग्य पाऊले उचलू शकली नाही.

जम्मू-काश्मीरच्या मुस्लिमांचा पाकिस्तानला पाठिंबा नाहीराजनाथ सिंह म्हणाले, 1965 च्या युद्धादरम्यान किंवा दहशतवादाच्या शिखरावर असताना जम्मू-काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानला साथ दिली नाही. अनेक मुस्लिम बांधवांनी दहशतवादाशी लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली. देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मोहम्मद उस्मान यांच्यासारख्या व्यक्तींच्या बलिदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.

ओमर अब्दुल्लांचे कौतुक राजनाथ सिंह यांनी ओमर अब्दुल्लांचे कौतुक केले. ते म्हणाले की, काश्मीर आणि देशाच्या इतर भागांमध्ये असलेली दरी कमी करणे हे आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून या दिशेने पावले उचलली जात आहेत. अखनूरमधील वेटरन्स डे सेलिब्रेशनने हे सिद्ध केले की, अखनूरचे आपल्या हृदयात दिल्लीसारखेच स्थान आहे.

सरकार दिल्ली आणि जम्मू-काश्मीरला समान वागणूक देतेसंरक्षण मंत्री म्हणाले की, भाजप सरकार दिल्ली आणि जम्मू-काश्मीरला समान वागणूक देते. पूर्वीच्या सरकारांनी काश्मीरला वेगळी वागणूक दिली होती. याचा परिणाम असा झाला की या भागातील आपले बंधू-भगिनी दिल्लीशी ज्या प्रकारे जोडले जायला हवे होते, तसे होऊ शकले नाहीत. मला भूतकाळात जायचे नाही कारण आमच्या सरकारचे सर्वात मोठे यश हे आहे की, आम्ही काश्मीर आणि देशाच्या इतर सर्व भागांमधील अंतःकरणातील दरी कमी करण्याचे काम करत आहोत.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तानIndiaभारतPOK - pak occupied kashmirपीओके