शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 18:45 IST

Jammu Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीरमधून कलम-370 हटवल्यानंतर वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे.

Jammu Kashmir Election 2024 :जम्मू-काश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजपचे माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर झालेल्या परिसीमनामुळे ही जागा अस्तित्वात आली आहे. पूर्वी हा भाग रियासी मतदारसंघात यायचा. या जागेवर भाजप आणि काँग्रेसनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने भाजपसाठी ही जागा महत्त्वाची आहे. अयोध्या आणि बद्रीनाथसारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी भाजपने जास्त जोर लावला आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अयोध्या आणि नाशिकसारख्या धार्मिक शहरांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि हरिद्वारच्या येथील पोटनिवडणुकीतही भाजपचा पराभव झाला. एवढंच नाही तर प्रयागराज आणि चित्रकूटसारख्या लोकसभेच्या जागा भाजपने गमावल्या होत्या. यातील अयोध्येचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. त्यामुळेच भाजप कोणत्याही परिस्थितीत श्री माता वैष्णोदेवीची जागा गमवायची नाही.

2008 आणि 2014 मध्ये भाजपने विजय मिळवला जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर झालेल्या परिसीमनामुळे माता वैष्णोदेवी विधानसभा जागा अस्तित्वात आली आहे. पूर्वी हा भाग रियासी सीटच्या अंतर्गत येत होता. 2008 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून भाजपने आपली पकड निर्माण केली होती. त्यानंतर 2014 मध्येही भाजपला यश मिळाले होते. गेल्या 16 वर्षांपासून भाजपचे येथे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपने बलदेवराज शर्मा यांना जबाबदारी दिली आहे, तर काँग्रेसने भूपेंद्र जामवाल यांना रिंगणात उतरवून लढत रंजक बनवली आहे.

भाजपसाठी सर्वात मोठा ताणभाजपसाठी सर्वात मोठे टेन्शन वैष्णोदेवीतील शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीचे आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूरमध्ये आयोजित सभेत बारीदारांना हक्क मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. फैजाबाद (अयोध्या) लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे शहरातील विकासकामांसाठी पाडण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणात घरे आणि जमिनींचा योग्य मोबदला न मिळणे. त्यामुळे अयोध्येतील जनतेने भाजपच्या विरोधात मतदान केल्याचे मानले जात आहे. श्री माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघातही अशीच स्थिती दिसून येत आहे. शेतकरी संतप्त असून अनेक दिवसांपासून आपल्या हक्काची मागणी करत आहेत.

माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघात एकूण 74 हजार मतदार आहेत. त्यापैकी सुमारे 15 हजार शेतकरी आहेत. बरिदार संघर्ष समितीचे अध्यक्ष श्याम सिंह माता वैष्णोदेवी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही स्पर्धा चांगलीच रंजक बनली आहे. मतांमध्ये फूट पडली तर भाजपला ही जागा जिंकणे सोपे जाणार नाही. इथे नेमका काय निकाल लागणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी