शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 18:26 IST

Rajnath Singh And Jammu Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्लांबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्लांबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. सुरक्षेत कोणतीही कमतरता नाही. "सुरक्षा दल दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता हल्ल्यांचं प्रमाण कमी झालं आहे. सुरक्षा दल सतर्क आहेत आणि अशी परिस्थिती येईल जेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया पूर्णपणे संपतील" असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 

राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. या भागात सुरक्षा दल सतत सक्रिय आहेत. २९ ऑक्टोबर रोजी सुरक्षा दलांनी अखनूरमध्ये एका उच्चस्तरीय चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या चकमकींवरून हे स्पष्ट होतं की, सुरक्षा दल दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करत आहेत आणि त्या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असताना राजनाथ सिंह यांनी यावर भाष्य केलं आहे. श्रीनगरच्या खानयार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानयार भागात सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली होती, ज्यामध्ये गोळीबार झाला होता.

खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सकाळपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये दोन वेगवेगळ्या चकमक सुरू आहेत. अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर श्रीनगरच्या खानयारमध्ये सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले. ज्या घरात दहशतवादी लपले होते, तिथे मोठा स्फोट झाला आहे. यानंतर घराला भीषण आग लागली. परिसरात धुराचे लोट दिसत आहे.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी