शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
2
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
3
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
4
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
5
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
6
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
7
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
8
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
9
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
10
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
11
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
12
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
13
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
14
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
15
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
16
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
17
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
18
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
19
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
20
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

"दहशतवादी ५-६ गोळ्या झाडल्यानंतर थांबायचे अन्..."; यात्रेकरुंनी सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 10:24 AM

यात्रेकरुंनी भरलेली बस शिवखोडीहून कटरा येथे जात असताना दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये यात्रेकरूंनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. बसचालकाला गोळी लागली आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस दरीत पडली. या हल्ल्यात ३० हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात्रेकरूंनी भरलेली बस शिवखोडीहून कटरा येथे जात असताना दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले बलरामपूर, यूपीचे रहिवासी संतोष कुमार वर्मा यांनी सांगितलं की, शिवखोडीला भेट दिल्यानंतर आम्ही कटराकडे जात होतो. बस वरून खाली येत असताना एका दहशतवाद्याने रस्त्याच्या मधोमध गोळीबार सुरू केला. चालकाला गोळी लागल्याने बस दरीत पडली. दहशतवाद्यांनी सुमारे २० मिनिटे गोळीबार केला. गोळीबार थांबल्यानंतर पोलीस आले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. दहशतवादी  गोळीबार करत होते. ५-६ वेळा गोळीबार केल्यानंतर ते थांबायचे आणि पाच मिनिटांनी पुन्हा गोळीबार सुरू करायचे.

यूपीच्या गोंडा येथील रहिवासी नीलम गुप्ता यांनी सांगितलं की, आम्ही शिवखोडीला भेट दिल्यानंतर येत होतो. दहशतवाद्यांनी गोळीबार केला, गोळी बसचालकाला लागली आणि बसवरचं नियंत्रण सुटलं आणि ती दरीत पडली. बस दरीत कोसळली तेव्हा आम्हाला दहशतवादी दिसत नव्हते. बसमध्ये लहान मुलांसह ४० लोक होते. आमच्या हातापायांना लागलं आहे. 

नीलम गुप्ता यांचा मुलगा पल्लव याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही बसमध्ये होतो आणि कोणी गोळीबार केला हे आम्हाला माहीत नाही. आवाज कमी झाल्यावर आम्ही सगळे बसमधून खाली उतरलो. काही वेळ गोळीबार झाला नाहीत, आम्ही दरीत पडलो. आमचे डोकं सीटखाली अडकलं, माझ्या बाबांनी मला बाहेर काढलं.

एका यात्रेकरूने सांगितलं की तेथे ६-७ दहशतवादी होते, त्यांचे चेहरे मास्कने झाकलेले होते. सुरुवातीला त्यांनी रस्त्यावर बसला घेरलं आणि गोळीबार केला. बस दरीत पडल्यावर ते बसच्या दिशेने खाली आले आणि सर्व लोक मारले गेले याची खात्री करण्यासाठी गोळीबार करत राहिले. आम्ही गप्प बसलो होतो. शिवखोडी येथून वैष्णोदेवीला संध्याकाळी ६ वाजता बस गेल्यानंतर ३० मिनिटांनी ही घटना घडली.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, यात्रेकरूंवरील क्रूर दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडलं जाणार नाही. रविवारी दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर शाह म्हणाले की, त्यांनी जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी आरआर स्वेन यांच्याशी चर्चा केली आणि दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी