शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

पंतप्रधान मोदींचं 'बुलेट' स्वप्न लटकलं; जपानने पैसे देणं थांबवलं!... 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 12:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला अस्तित्वात येण्यापूर्वीच मोठा ब्रेक लागला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला अस्तित्वात येण्यापूर्वीच मोठा ब्रेक लागला आहे. या प्रोजेक्टसाठी फंडिंग करणारी जपानची कंपनी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी(जीका)नं बुलेट ट्रेन नेटवर्कसाठी लागणारा निधी देण्यास नकार दिला आहे. तसेच या कंपनीनं मोदी सरकारला सल्लाही दिला आहे.विशेष म्हणजे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट दामटण्याऐवजी मोदींनी देशातील शेतक-यांच्या समस्या सोडवण्याची गरज आहे, असंही जीका म्हणाली आहे. एक लाख कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेननं गुजरात आणि महाराष्ट्र जोडला जाणार असला तरी यात दोन्ही राज्यांतील अनेक शेतक-यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यामुळे या जमीन अधिग्रहणाचा वाद चिघळला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं एक स्पेशल कमिटीचीही स्थापना केली आहे. त्यातच आता जीकानं पैशांचा पुरवठा रोखल्यानं हा प्रोजेक्ट बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोदी सरकारनं आधी शेतक-यांच्या समस्या सोडवण्याची गरज आहे, असंही या प्रोजेक्टला फंडिंग करणा-या जपानी कंपनीनं सांगितलं आहे.या प्रोजेक्टला 2022पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. परंतु जपाननं फंडिंग रोखल्यानं मोदींचं हे लक्ष्य बारगळण्याची शक्यता आहे. जीका ही जपान सरकारची कामे एक संस्थेच्या माध्यमातून करत असते. ती संस्था जपान सरकारसाठी आंतरराष्ट्रीय  स्तरावर सामाजिक आणि आर्थिक रणनीती ठरवते. तर दुसरीकडे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड(एनएचआरसीएल)कडे भारतानं बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट सोपवला आहे. परंतु भारताच्या एनएचआरसीएलला गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतक-यांच्या समस्या सोडवण्यात अडचणी येत आहेत. बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टमध्ये जमीन गेलेल्या शेतक-यांनी मोदी सरकारकडून जास्तीची भरपाई मागितली आहे. तसेच या भरपाईसह दोन्ही राज्यांतील जमीन जाणा-या शेतक-यांनी मोदी सरकारकडून इतर सुविधांचीही मागणी केली आहे. तलाव, स्कूल, सोलर लाइटसह गावस्तरावर हॉस्पिटल आणि डॉक्टरची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्याही या शेतक-यांनी केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे पालघरमधील 73 गावे बाधित होणार आहेत. यापैकी सद्य:स्थितीत केवळ 50 टक्के जमिनीचे संयुक्त मापन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून अद्याप भू-संपादन बाकी आहे. उर्वरित सुमारे 50 टक्के काम 120 दिवसांत करण्याची ‘डेडलाइन’ नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनपुढे आहे. मुंबईतील चार बुलेट स्थानकांसाठी पालघर जिल्ह्यात 73, ठाणे 22, डहाणू 2 आणि मुंबई उपनगरातील 2 गावांचा समावेश आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यात संयुक्त मापन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर, पालघर जिल्ह्यातही 38 गावांचे संयुक्त मापन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही 35 गावांचे सर्वेक्षण बाकी आहे. त्यामुळे मोदींच्या या प्रकल्पाबाबत सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनNarendra Modiनरेंद्र मोदी