शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

हरियाणातील बुद्धिबळपटू अनुराधा बेनिवालचे जाट बांधवांना शांततेचे आवाहन

By admin | Published: February 24, 2016 3:25 PM

ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावे या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे हरियाणा धुमसत असताना रोहतकच्याच एका तरूणीने व्हिडीओच्या माध्यमातून याबद्दल नाराजी दर्शवत हिंसक आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाइन लोकमत

चंदीगड, दि. २४ - ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावे या मागणीसाठी जाट समाजाने पुकारलेल्या आंदोलनामुळे धुमसलेले हरियाणा अद्याप पूर्णपणे शांत झालेले नसून राज्यात तणावाचे वातावरण कायम आहे. १९ जणांचा बळी घेणा-या या आंदोलनानंतर हिंसाचारग्रस्त जाटबहुल हिस्सार, हांसी, भिवानीमध्ये संचारबंदी अद्याप लावण्यात आलेली आहे. मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर हरियाणाच्याच रोहतकमधील अनुराधा बेनिवाल या तरूणीने एका व्हिडीओच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे तसेच आपलेच राज्य न जाळण्याचे आवाहन केले आहे. २९ वर्षीय अनुराधा ही एक चेस चॅम्पियन असून तिने एक हिंदी पुस्तकाचे लेखनही केले आहे. 
सध्या लंडनमध्ये असलेल्या अनुराधाने या व्हिडीओतून आपल्याचा (जाट) बांधवांना अनेक रोखठोक प्रश्न विचारत हिसांचार न करण्याचे आवाहन केले. गेल्या आठवड्याभरापासून जाट आंदोलनामुळे हरियाणा धुमसत असून त्याचे लोण उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमध्येही पोहोचले होते. बोलीभाषेतून रेकॉर्ड केलेल्या या व्हिडीओत अनुराधाने या सर्व गोष्टींबाबात नाराजी नोंदवली आहे. ' मी जेव्हा बुद्धिबळ (चेस) शिकायला सुरूवात केली तेव्हा मला कोणीही माझी जात विचारली नव्हती ' असे सांगतानाच अनुराधाने जाट बांधवांना एकात्मतेचा तसेच हिंसाचार त्वरित थांबवण्याचा सल्ला दिला. या हिंसाचारामुळे फक्त राज्याला आर्थिक फटका बसणार नसून त्याचा राज्याच्या प्रतिमेवरही प्रतिकूल परिणाम होणार असल्याचे तिने नमूद केले आहे. 
' जेव्हा तुम्ही राज्यातील मालमत्ता जाळता तेव्हा तुम्ही स्वत:च्याच जमिनीवर विध्वंस घडवत असता, त्यात तुमची स्वत:चीच झाडं, घरं जळत असतात, इतर कोणाचेच नुकसान होत नाही. तुम्ही केलेले नुकसान पाहिल्यानंतर कोणती कंपनी (उद्योगासाठी) या राज्यात येईल? आपल्या राज्याचा विकास कसा होईल?' असा प्रश्न विचारत या सर्व बाबींमुळे आपल्याच राज्याचे नुकसान होत असल्याचे तिने स्पष्ट केले. ' आपला विकास करण्यासाठी तुम्हाला स्वत:लाच तशी परिस्थिती निर्माण करावी लागेल' असेही तिने नमूद केले. 
अनुराधाच्या या व्हिडीओमुळे अद्याप पुरेसा प्रभाव पडला नसला तरीही अनेक लोकांनी तिच्या या प्रयत्नांचे कौतुक केले असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
  • जाट आंदोलनाचा उत्तरेकडील राज्यांमधील रेल्वे सेवेला मोठा फटका बसला आहे. सुमारे ७३६ रेल्वे रद्द केल्या असून, १०५ गाड्या अन्य मार्गाने वळत्या केल्या. रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, वाहतूकदारांना सुमारे २०० कोटींचा फटका बसला. पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर या राज्यांकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील सेवा ठप्प झाल्या आहेत.