शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

जाट आंदोलन थंडावले; तणाव कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2016 2:43 AM

पोलिसांच्या निष्क्रियतेविरुद्ध संतप्त जमावाने रोहतक येथे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांना घातलेला घेराव वगळता मंगळवारी कोणतीही अनुचित घटना न घडल्यामुळे जाट आंदोलनाची

चंदीगड : पोलिसांच्या निष्क्रियतेविरुद्ध संतप्त जमावाने रोहतक येथे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांना घातलेला घेराव वगळता मंगळवारी कोणतीही अनुचित घटना न घडल्यामुळे जाट आंदोलनाची धग कमी झाल्याचे; मात्र तणाव कायम असल्याचे संकेत मिळाले आहेत. दुसरीकडे हिंसाचारग्रस्त जाटबहुल हिस्सार, हांसी, भिवानीमध्ये संचारबंदी कायम असून ती केवळ रोहतकमध्ये चार तासांसाठी शिथिल करण्यात आली. हरियाणामध्ये ‘रास्ता रोको’ करण्यासाठी ठिकठिकाणी लावलेले अडथळे हटविण्यात आल्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. अंबाला- दिल्ली महामार्गावरील वाहतूक पानीपतपर्यंत सुरू झाली. सोनीपत येथील स्थिती पूर्ववत होताच पुढील वाहतूक पूर्ववत होईल अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जाट आंदोलनात एकूण १९ जण मृत्युमुखी पडले आहेत. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांच्या चिथावणीमुळेच आंदोलन हिंसक झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्याचे खंडण करताना हुड्डा म्हणाले की संबंधित पुरावा बनावट आहे. मात्र काँग्रेसने याबाबतचे स्पष्टीकरण हुड्डा यांच्याकडे मागितले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीने केंद्रीय नोकऱ्यांमध्ये जाटांना आरक्षण देण्याच्या मुद्यावर चर्चेसाठी मुख्यमंत्री खट्टर यांना दिल्लीला पाचारण केले आहे. (वृत्तसंस्था)