शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

जयललितांच्या जयंती दिनी जाहीर करणार राजकीय भूमिका - दीपा जयकुमार

By admin | Published: January 17, 2017 11:28 AM

जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जयललितांची

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 17 -  जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जयललितांची मैत्रिण शशिकला पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे सरसावल्या असतानाच आता त्यांच्यासमोर जयललितांची भाची दीपा जयकुमार यांच्या स्वरूपात आव्हान उभे राहिले आहे. जयललितांच्या चेहऱ्याशी मिऴती जुळती ठेवण असलेल्या दीपा सक्रीय राजकारणात उतरण्यासाठी सज्ज झाल्या असून, जयललिता यांच्या जयंती दिवशी आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे दीपा यांनी आज सांगितले. 
दीपा जयकुमार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या राजकीय वाटचालीविषयी भाष्य केले, त्या म्हणाल्या. "जयललितांच्या स्थानी मी अन्य कुणालाही पाहू शकत नाही, सध्या माझ्याकडे दोन पर्याय आहेत, त्यापैकी एक म्हणजे एआयएडीएमकेत सहभागी होणे आणि दुसरा म्हणजे सरळ नव्या पक्षाची स्थापना करणे. मात्र यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी मी माझ्या समर्थकांशी चर्चा करणार आहे."
  सध्या नेतृत्वहीन असलेल्या अण्णा द्रमुक पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक दावेदार उत्सुक आहेत, पण एका व्यक्तिच्या नेतृत्वावर पक्षात एकमत होत नसल्याने हा पक्ष फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या शशिकला  नटराजन पक्षाचे नेतृत्व सांभाळत असल्यातरी दीपा यांच्या सक्रिय होण्यामुळे पक्षात नेतृत्वावरून लढाईला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 
( ...तर जयललितांचा मृतदेह बाहेर काढण्याचा आदेश देऊ - मद्रास उच्च न्यायालय )
 
 42 वर्षीय दीपा यांनी सक्रीय राजकारणात उतरण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तामिळनाडूत लागत असलेल्या त्यांच्या पोस्टरमध्ये त्यांच्या चेहऱ्याची ठेवण जयललितांच्या चेहऱ्याशी मिळताजुळता ठेवण्याची काळजी घेतली जात आहे. तसेच चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित त्या जयललिता यांच्यासारख्याच साड्या परिधान करत आहेत. 
( निवडणूक कागदपत्रांवर जयललितांचा डावा अंगठा
 
जयललितांच्या भावाची मुलगी असलेल्या दीपा यांचे शिक्षण लंडनमध्ये झाले असून,  जयललिता यांच्यावर उपचार सुरू असताना आपल्याला जयललिता यांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप केल्यावर त्या प्रकाशझोतात आल्या होत्या.  तसेच जयललितांच्या अंत्ययात्रेतही आपल्याला जाऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला होता.