शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

NDA सरकारच्या घटक पक्षातील मंत्री एका निर्णयावर नाराज, भाजपाचा पाठिंबा काढून घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 17:30 IST

सरकारने नीट विचार करून निर्णय घेतला नसल्याचे केले व्यक्त केले रोखठोक विधान

Jayant Chaudhary: लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. या निवडणुकीत भाजपाने ४००पार ची घोषणा दिली होती पण प्रत्यक्षात त्यांना २५०चा आकडाही गाठता आला नाही. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यासह इतर घटक पक्षांच्या पाठिंब्याने केंद्रात भाजपप्रणित एनडीए सरकार स्थापन झाले. सहकारी घटक पक्ष लवकरच भाजपाची साथ सोडतील आणि एनडीए सरकार लवकरच कोसळेल, असा दावा इंडिया आघाडीतील नेतेमंडळी सातत्याने करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत एका सहकारी पक्षातील एक केंद्रीय राज्यमंत्री भाजपा सरकारच्या कार्यप्रणालीवर नाराज असल्याचे दिसत आहे. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक दल ( RLD )चे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी कावड यात्रेवरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे घटक असलेल्या आरएलडीकडून जयंत चौधरी हे राज्यसभेवरील खासदार आहेत. जयंत चौधरी यांच्या विधानाचा संबंध आगामी १० विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीशी जोडला जात आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी आपल्या स्थानिक राजकीय कारकीर्दाच्या दृष्टीने अशी भूमिका मांडताना दिसत आहेत, असा अंदाज बांधला जात आहे. कावड यात्रा मार्गावर असलेल्या भोजनालयांच्या मालकांची नावे त्यांच्या दुकानांवर डिस्प्ले करण्यात यावी, असा आदेश उत्तर प्रदेश सरकारने काढला. या आदेशावर टीका करत हा आदेश मागे घेण्याची मागणी जयंत चौधरी यांनी केली आहे.

"हा आदेश काढण्याआधी सारासार विचार करण्यात आलेला दिसत नाही. मला असे वाटते की सरकार या आदेशावर ठाम आहे कारण हा निर्णय आधीच घेऊन झालेला आहे. सरकारमध्ये कधी कधी असे प्रकार घडतात. प्रत्येक जण कावड यात्रेत सेवा करण्याच्या विचाराने सहभागी होतो. कोणीही नावाने ओळखले जाण्यासाठी सहभाग घेत नाही. सरकारने हा निर्णय विचार करून घेतला नाही. पण या प्रकरणाला धर्म आणि जातीशी जोडू नये" असे ते म्हणाले.

दरम्यान, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या आदेशवर स्थगिती आणली.

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी