शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

जैश-ए-मोहम्मद भाजपाचं पिल्लू, कपिल सिब्बल यांचा सनसनाटी आरोप

By admin | Published: October 07, 2016 2:51 PM

भाजपा एवढ्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं म्हणत कपिल सिब्बल यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरुन आरोप - प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका करत खून की दलाली करत असल्याचा आरोप केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत दलाली हा शब्द काँग्रेसला लागू पडतो. तो शब्द त्यांनी आपल्यापर्यंतच ठेवावा. आम्हाला तो शब्द जोडू नये अशा समाचार घेतला. यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत ज्यांच्या विरोधात हत्येचे गुन्हे आहेत ते आम्हाला शिकवणार, भाजपा एवढ्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं म्हणत कपिल सिब्बल यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 
 
कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर आरोपांच्या फैरी झाडल्या. जैश-ए-मोहम्मदला भाजपाने तयार केलं असल्याचा आरोप कपिल सिब्बल यांनी केला. मसूद अजहरला भाजपाने सोडलं, आणि तिकडे जाऊन त्याने जैश-ए-मोहम्मद तयार केला, आणि आमच्यावर आरोप करता असा सवाल कपिल सिब्बल यांनी विचारला. 
 
 
पाकिस्तान काय आहे माहित असतानाही तिकडे जाऊन वाढदिवस साजरा करण्याची काय गरज होती. एका बाजूने मैत्री करता आणि दुसरीकडे आमच्यावर आरोप करता असं कपिल सिब्बल बोलले आहेत. पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक केला असं म्हणणं लष्कराचा अपमान आहे, त्यांची माफी मागायला हवी. लष्कराच्या यशस्वी कामगिरीवर राजकारण करणं बंद करा, पोस्टरबाजी बंद करा असंही कपिल सिब्बल बोलले आहेत. 
 
अटलबिहारी वाजपेयी ज्यांना दुर्गा म्हणायचे त्या इंदिरा गांधींमध्ये दोष होता का ? राजीव गांधींमध्ये दोष होता का ? असे सवाल कपिल सिब्बल यांनी विचारले. बेजबाबदार वक्तव्य होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: निवेदन द्यावे, पण फायदा उचलायचा असल्याने तेदेखील मजबूर आहेत असा टोला कपिल सिब्बल यांनी लगावला.
 
पाकिस्तान एक पेशंट आहे, तो चांगला राहावा अशी भारताची इच्छा आहे. आज त्या पेशंटला दहशतवादाचा कॅन्सर झाला आहे. आपल्याला केमिओथेरपी देण्याची गरज आहे, जे संरक्षण दल देत आहे. हा कॅन्सर संपवण्यासाठी आम्ही मोदींसोबत आहोत, कॅन्सर बरा व्हावा आणि दोघांनी एकत्र नांदावे असं आम्हाला वाटतं. पण सर्जिकल स्ट्राईकनंतर हा कॅन्सर संपला, आपण जिंकलो असं यांना वाटत आहे. पण एका सर्जिकल स्ट्राईकने कॅन्सर संपत नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. 
 
पत्रकार परिषदेतील मुद्दे - 
- ज्यांच्या विरोधात हत्येचे गुन्हे आहेत ते आम्हाला शिकवणार, भाजपा एवढ्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं 
- अटलबिहारी वाजपेयी ज्यांना दुर्गा म्हणायचे त्या इंदिरा गांधींमध्ये दोष होता ? राजीव गांधींमध्ये दोष होता ?
- नरेंद्र मोदी यांनी स्वत: निवेदन द्यावे, पण तेदेखील मजबूर आहेत कारण फायदा उचलायचा आहे 
- कारगिलमध्ये नियंत्रण रेषा ओलांडली गेली नव्हती का 
- आम्ही कधीच लष्कराच्या कारवाईचं राजकारण केलं नाही 
- पाकिस्तान एक पेशंट आहे, तो चांगला राहावा अशी भारताची इच्छा आहे
- आज त्या पेशंटला दहशतवादाचा कॅन्सर झाला आहे, आपल्याला केमिओथेरपी देण्याची गरज आहे, जे संरक्षण दल देत आहे
- हा कॅन्सर संपवण्यासाठी आम्ही मोदींसोबत आहोत, कॅन्सर बरा व्हावा आणि एकत्र नांदावे असं आम्हाला वाटतं
- सर्जिकल स्ट्राईकनंतर हा कॅन्सर संपला, आपण जिंकलो असं यांना वाटत आहे, एका सर्जिकल स्ट्राईकने कॅन्सर संपत नाही 
- पोस्टरबाजी बंद करा, लष्कराच्या यशस्वी कामगिरीवर राजकारण करणं बंद करा
- जैश-ए-मोहम्मदला भाजपाने तयार केलं, मसूद अजहरला भाजपाने सोडलं, आणि आमच्यावर आरोप करता  
- पाकिस्तान काय आहे माहित असतानाही तिकडे जाऊन वाढदिवस साजरा करण्याची काय गरज होती
- एका बाजूने मैत्री करता आणि दुसरीकडे आमच्यावर आरोप करता
- पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक केला असं म्हणणं लष्कराचा अपमान आहे, त्यांची माफी मागायला हवी