शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

“पंतप्रधान होण्याचे तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही”; JDUचा राहुल गांधींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 16:39 IST

Congress Vs JDU: राजकारणात काहीतरी साध्य करण्यासाठी खोट्या विधानांचा आधार घेऊ नका. तुमच्या विनोदांमुळे देशाचे केवळ मनोरंजन होत राहील, असा पलटवार जदयूने केला आहे.

Congress Vs JDU: ममता बॅनर्जी यांच्यानंतर आम आदमी पक्षासह जदयूने इंडिया आघाडीपासून फारकत घेतली. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडत थेट भाजपासोबत जाऊन सत्तांतर घडवले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली. राहुल गांधींनी केलेल्या टीकेवर जदयू नेत्यांनी पलटवार केला आहे. 

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगाल, बिहारमध्ये आहे. बिहारमधील शेतकरी आर्थिक अन्यायाचे बळी पडत आहेत. आम्ही त्यांच्या हितासाठी लढत राहू. नितीश कुमार थोडाही दबाव सहन करू शकत नाहीत. ते लगेचच घुमजाव करतात. दबाव आला की पारडे बदलतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. याला आता जदयू नेते ललन सिंह यांनी उत्तर दिले आहे.

पंतप्रधान होण्याचे तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही

तुमच्या दबावाखाली बिहारमध्ये जातिनिहाय जनगणना करण्यात आली, असे तुम्ही म्हणता. इतके मोठे खोटे कुणी बोलू शकत नाही. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, नितीश कुमार कधीही कोणत्याही दबावाखाली काम करत नाहीत. जातिनिहाय जनगणना हा नितीश कुमार यांचा निर्धार होता. जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा नितीश कुमार यांनी व्ही.पी.सिंह यांच्या कार्यकाळात मांडला होता. तेव्हा तर तुमचा राजकीय उदयही झाला नव्हता. असत्याचा आधार कायम घेत राहिलात तर पंतप्रधान होण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. तुम्ही पप्पू आहात आणि पप्पू राहाल. तुमच्या विनोदांमुळे देशाचे केवळ मनोरंजन होत राहील, या शब्दांत ललन सिंह यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, इंडिया आघाडीच्या बंगळुरू आणि मुंबईतील बैठकीत जदयू पक्षाने ठराव मंजूर करायला सांगितला गेला, तेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध केला. तेव्हा तुम्ही गप्प राहून त्यांना पाठिंबा दिला. देशाच्या राजकारणात काहीतरी साध्य करण्यासाठी खोट्या विधानांचा आधार घेऊ नका. यामुळेच तुमचा काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस अधिकाधिक ढासळत चालला आहे, अशी टीकाही ललन सिंह यांनी केली. 

टॅग्स :Janta Dal Unitedजनता दल युनायटेडBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारRahul Gandhiराहुल गांधी