शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

झारखंड सरकार पाडण्यासाठी आसाममध्ये रचले जात होते षडयंत्र? मुख्यमंत्री हिमंता यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 9:05 PM

Jharkhand Political Crisis: पश्चिम बंगालच्या हावडा येथे मोठ्या रकमेसह पकडलेले झारखंडमधील तीन आमदार आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली :  पश्चिम बंगालमधील हावडा येथे शनिवारी झारखंडमधीलकाँग्रेसच्या तीन आमदारांना मोठ्या प्रमाणात रोख रकमेसह अटक केल्याप्रकरणी वाद अधिकच चिघळत चालला आहे. झारखंडमध्येकाँग्रेस अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी आसाममध्ये झारखंड सरकार अस्थिर करण्याचा षडयंत्र रचले जात असल्याचा दावा केला आहे. तसेच, आजकाल आसाम हे सरकार पाडण्याचे केंद्रबिंदू बनले आहे, असे  राजेश ठाकूर यांनी महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा उल्लेख करत म्हटले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आता काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसशी दीर्घकाळ संबंध असल्याने मी पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असतो, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. पण झारखंड सरकार पाडण्याच्या कथित कटातील आपल्या भूमिकेचे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, काँग्रेस नेते माझे जुने मित्र आहेत आणि सर्वांना हे माहित आहे. तसेच, ते म्हणाले की, काँग्रेस नेते जुने मित्र म्हणून माझ्याशी संपर्कात असतात. मी 20 वर्षांहून अधिक काळ त्या पक्षात होतो. इथे आल्यावर ते मला भेटतात. मी नवी दिल्लीत असताना त्यांना भेटतो. दरम्यान, हिमंता बिस्वा सरमा 2015 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत.

आमदार आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात?पश्चिम बंगालच्या हावडा येथे मोठ्या रकमेसह पकडलेले झारखंडमधील तीन आमदार आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पश्चिम बंगाल पोलिसांनी शनिवारी रात्री काँग्रेसचे तीन आमदार इरफान अन्सारी, राजेश कछाप आणि नमन बिक्सल कांग्री यांना हावडा येथील रानीहाटीमध्ये राष्ट्रीय महामार्ग-16 वर अडवले आणि त्यांच्या वाहनातून मोठी रोकड जप्त करण्यात आली. रविवारी दुपारी पोलिसांनी त्यांना अटक केली. 

टॅग्स :Jharkhandझारखंडcongressकाँग्रेसAssamआसाम