शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रेल्वेनं मनं जिंकली! प्रसुती वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेसाठी ३ किमी उलट दिशेनं चालवली ट्रेन, वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 17:18 IST

माणुसकीपेक्षा मोठा कोणताच धर्म नसतो आणि भारतीय रेल्वेनं (Indian Railway) मानवतेचं उत्तम उदाहरण सादर करत प्रसुती वेदनांनी विव्हळणाऱ्या गर्भवती महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचवले आहेत.

माणुसकीपेक्षा मोठा कोणताच धर्म नसतो आणि भारतीय रेल्वेनं (Indian Railway) मानवतेचं उत्तम उदाहरण सादर करत प्रसुती वेदनांनी विव्हळणाऱ्या गर्भवती महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचवले आहेत. गर्भवती महिलेला मदत करण्यासाठी ट्रेन तीन किलोमीटर उलट दिशेनं चालवली. बाकया टाटानगर ते भुवनेश्वर रेल्वेमार्गावर ही घटना घडली आहे. टाटानगरहून भुवनेश्वरसाठी मंगळवारी रात्री रवाना झालेल्या आनंद विहार-भुवनेश्वर संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये (Sampark Kranti Express) एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी ट्रेन गंतव्य स्थानाच्या विरुद्ध दिशेनं चालवावी लागली. 

ट्रेन जवळपास तीन किलोमीटर विरुद्ध दिशेनं प्रवास करुन टाटानगर रेल्वे स्थानकावर आणण्यात आली आणि रेल्वे स्थानकावरील वैद्यकीय पथकानं गर्भवती महिलेला मदत केली. वैद्यकीय पथकाच्या सहाय्यानं महिलेला खासमहलस्थित एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेची यशस्वीरित्या प्रसूती झाली आणि आई व मूल दोघंही सुखरुप असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला आहे. संबंधित महिलेचं नाव रानू दास असल्याचं सांगितलं जात आहे. महिलेला वैद्यकीय पथकाकडे सुपूर्द केल्यानंतर रेल्वेनं पुन्हा गंतव्य दिशेकडे प्रवास सुरू केला. दरम्यान, रेल्वेतील प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचं आणि तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल कौतुक केलं. 

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला रेल्वेच्या कोच क्रमांक-५ मधून प्रवास करत होती. त्यांना जलेश्वर रेल्वेस्थानकावर उतरायचं होतं. ट्रेन राशी उशिरा टाटानगर रेल्वेस्थानकातून निघाली. काही वेळानंतर संबंधित महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि याची माहिती मोटरमनला मिळाली. तातडीनं याची माहिती टाटानगर रेल्वे स्थानकात देण्यात आली. ट्रेन टाटानगर स्थानकापासून जवळपास अडीच ते तीन किलोमीटर पुढे निघून गेली होती. टाटानगर रेल्वे स्थानक अधिक्षकांनी ग्रीन सिग्नल देताच तातडीनं ट्रेन उलट दिशेने नेत पुन्हा एकदा टाटा नगर रेल्वेस्थानकावर आणण्यात आली. 

टाटानगरहून तीन किमी पुढे ट्रेन पोहोचली होती आणि पुढचं स्थानक येण्यासाठी कमीत कमी दोन तास लागले असते. त्यामुळे महिला आणि बाळाच्या जीवाला धोका होता. त्यामुळे टाटानगर रेल्वे स्थानक जवळ असल्याचं पुन्हा मागे परतण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ट्रेन पुन्हा टाटानगर रेल्वे स्थानकावर पोहोचेपर्यंत रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांनी जवळच्या रुग्णालयात संपर्क साधून वैद्यकीय पथक तयार ठेवलं. वैद्यकीय पथक वेळेत रेल्वे स्थानकावर पोहोचलं आणि महिलेला वेळीच उपचार मिळाले. रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांचं आणि त्यांनी दाखवलेल्या तत्परतेचं प्रवाशांकडून तोंड भरुन कौतुक केलं गेलं. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेJharkhandझारखंड