शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

"रेल्वेमंत्र्यांनी रील बनवणं सोडून द्यावं"; अपघातावरुन ममता-अखिलेश यांचा मोदी सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 1:00 PM

Jharkhand Train Accident : सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांवरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. २०१४ पासून मोदी सरकारच्या काळात झालेल्या अपघातांचा उल्लेख करून काँग्रेसने केंद्रावर हल्लाबोल केला.

झारखंडच्या सरायकेला-खरसावां जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मुंबई-हावडा मेलचा अपघात झाला. या अपघातात १८ डबे रुळावरून घसरले, त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांवरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. २०१४ पासून मोदी सरकारच्या काळात झालेल्या अपघातांचा उल्लेख करून काँग्रेसने केंद्रावर हल्लाबोल केला, तर JMM ने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका करत रील बनवणं सोडून द्यावं असं म्हटलं आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटलं की, "रेल्वे अपघात आता नियमित झाले आहेत. दर आठवड्याला घटना घडत आहेत. सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. झारखंडमध्ये हावडा-मुंबई मेल रुळावरून घसरली. यात अनेकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. हे खूप दुःखद आहे."

"रेल्वे रुळांवर प्रवाशांच्या मृत्यूची आणि जखमींची मालिका किती दिवस सुरू राहणार? हे आम्ही किती दिवस सहन करणार? भारत सरकारच्या असंवेदनशीलतेला अंत होणार नाही का?" सपा खासदार अखिलेश यादव य़ांनी देखील यावर भाष्य केलं आहे. सरकारला प्रत्येक क्षेत्रात रेकॉर्ड बनवायचे आहे. सध्या पेपरफुटीचे रेकॉर्ड सुरू होते. यामागे रेल्वे अपघातांचे रेकॉर्ड तयार केले जात आहे. एवढे मोठे सुरक्षा बजेट असतानाही इतके रेल्वे अपघात का होत आहेत? असा सवाल विचारला आहे. 

झारखंड मुक्ती मोर्चानेही याप्रकरणी केंद्र सरकारला धारेवर धरलं. रेल्वेमंत्र्यांनी रील बनवणं थांबवावं आणि रेल्वेवर लक्ष केंद्रित करावं. हेमंत सोरेन किंवा इंडिया आघाडीचा यात कोणताही हात नाही. आम्हाला ईडी-सीबीआयमध्ये अडकवण्याची धमकी देऊ नका असं म्हटलं आहे. "रेल्वे अपघात सातत्याने होत आहेत. हे लाजिरवाणे आहे. रेल्वे अपघातांवर कारवाई होत नाही. आमचे रेल्वेमंत्री केवळ प्रचारात व्यस्त आहेत" असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAkhilesh Yadavअखिलेश यादवrailwayरेल्वेAccidentअपघात