शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

जिंकली बंगाली अस्मिता! व्हीलचेअरवर रोड शो, खूर्चीवर बसूनच प्रचारसभा

By shrimant maney | Updated: May 3, 2021 01:46 IST

भाजपकडून असभ्य भाषेत होणारा प्रचार ममता बॅनर्जी यांच्या पत्थ्यावर

श्रीमंत मानेदिल्लीवरून चौखूर उधळलेले नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या अश्वमेधाचे वारू अखेर हुगळीच्या काठावर बंगालच्या वाघिणीने रोखले. वाघीणही कशी तर नंदीग्राममध्ये प्रचाराच्या सुरवातीलाच गर्दीत जखमी झालेली. तो जखमी डावा पाय घेऊनच जवळपास दोन महिने ममता बॅनर्जींनी बंगाल पिंजून काढला. व्हीलचेअरवर रोड शो केला. खूर्चीवर बसूनच प्रचारसभा घेतल्या. मोदी व शहा हे दोघे सर्वशक्तिमान नेते. त्यांचे आक्रमण असे जोरदार की प्रतिस्पर्ध्यांचा विध्वंसच होणार. त्यामुळेच देशाचा एखाददुसरा कोपराच त्यांनी पादाक्रांत होण्यापासून वाचला आहे. यावेळी ते नेते-कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन पूर्ण ताकदीनिशी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत पश्चिम बंगालवर तुटून पडले. प्रत्येक मतदारसंघ इंच इंच लढविला. भाजपचे जुने व तृणमूल व अन्य पक्षातून आलेले नवे असे सगळे मिळूनही थोडे उमेदवार कमी पडताहेत वाटले तर एक एक जागा महत्त्वाची असल्याने लोकसभा व राज्यसभेच्या मिळून पाच खासदारांनाही मैदानात उतरविले. त्यापैकी लोकसभा जिंकणारे विधानसभेत पराभूत झाले. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे गृहराज्य जिंकणे भाजपला जमलेच नाही.

ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा विजय सोपा नव्हता. डझनावारी नेते सोडून गेल्याने पक्ष खिळखिळा झाला होता. थोडीबहुत आशा होती ती पक्षाच्या संघटनेकडून. कॉलेज जीवनापासून आक्रमक नेत्या अशी प्रतिमा असलेल्या, आक्रमण हाच बचावाचा मार्ग मानणाऱ्या ममतांनी लोकभावनेची नाडी, कार्यकर्त्यांची मानसिकता ओळखली. बड्यांना ललकारणारे नेहमीच समाजाचे हीरो बनतात, हे ओळखले. शेतजमिनीसाठी संघर्षामुळे ज्या नंदीग्रामने त्यांचे नेतृत्त्व फुलविले, तिथेच शुभेन्दू अधिकारी यांच्या रूपाने बंड झाले. त्या भागात प्रचंड प्रभाव असलेले अधिकारी घराणे विरोधात गेले. तेव्हा, भवानीपूर हा जुना परंपरागत मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून लढण्याचा निर्णय घेतला. अन्य कुणी नेता दोन जागांवर लढला असता. ममता बॅनर्जी यांनी हे टाळले. हा विजयाचा पहिला टप्पा होता.

जखमी पाय, बर्म्युडा, दीदी ओ दीदी, अशा असभ्य भाषेत भाजपकडून होणारा प्रचार ममता बॅनर्जी यांच्या पत्थ्यावर पडला. महिलांमध्ये सहानुभूती निर्माण झाली. भाजपने ममता बॅनर्जी व तृणमूलवर हल्ले वाढविताच बंगाली अस्मिता आकार घेऊ लागली. लोकांशी चर्चा करताना ती सूक्ष्म लाट जाणवत होती. ढोकळा-फाफडा नको, आपला रसगुल्लाच बरा, अशी त्या अंडरकरंटची भाषा होती.

धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर दिल्ली टक्कर या निमित्ताने गायपट्ट्याच्या बाहेर हिंदुत्त्वाच्या मुद्याचाही कस लागला. जय श्रीरामच्या घोषणेसह धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजपकडून झाला. तेव्हा आपल्या मुख्यमंत्री धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर भाजपचे आव्हान स्वीकारताहेत हे पाहताच एरव्ही डावे पक्ष किंवा काँग्रेसचा परंपरागत म्हणविला जाणारा मतदार पूर्ण ताकदीने ममता बॅनर्जींच्या पाठीशी उभा राहिला. त्यात अल्पसंख्यांक मुस्लीम मतदारांसोबत सहिष्णू हिंदू मतदारही मोठ्या प्रमाणावर होते हे निकालाने स्पष्ट झाले.

तृणमूलमधून भाजपमध्ये इतके नेते आले की मूळ भाजपचा चेहराच हरवला. त्यामुळे जुने भाजप कार्यकर्ते अस्वस्थ झाले. त्यात पुन्हा ज्यांचे तृणमूलमध्ये एकमेकांशी पटत नव्हते ते भाजपमध्ये आल्यानंतर पुढे काय होणार, याचीही चर्चा होऊ लागली.

n ममता बॅनर्जींचा हा विजय २०१६ पेक्षा मोठा व सध्याच्या राजकीय स्थितीचा विचार करता ऐतिहासिक आहे. या निवडणुकीत आक्रमण कसे करावे याचा वस्तुपाठ भाजपने देशासमोर ठेवला तर भाजपशी, विशेषत: मोदी-शहा यांच्याशी कसे त्यांच्याच शैलीत लढावे, कसे त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर द्यावे, हे ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिले.

n तुम्ही सुसंस्कृत राजकारण व सभ्यता सोडणार असाल तर आम्हीही तसेच करू. तुम्ही साम, दाम, दंड भेद वापरणार असाल तर आमचे हात बांधलेले राहणार नाहीत, हा या राजकीय संघर्षातील स्पष्ट संदेश आहे.

शेतजमिनीसाठी संघर्षामुळे ज्या नंदीग्रामने त्यांचे नेतृत्त्व फुलविले, तिथेच शुभेन्दू अधिकारी यांच्या रूपाने बंड झाले. त्या भागात प्रचंड प्रभाव असलेले अधिकारी घराणे विरोधात गेले. तेव्हा, भवानीपूर हा जुना परंपरागत मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून लढण्याचा निर्णय घेतला. हाच त्यांचा पहिला पिजय.

बंगालला ढोकळा-फाफडा नको, आपला रसगुल्ला प्यारा

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcorona virusकोरोना वायरस बातम्याElectionनिवडणूक